खटाव / वार्ताहर :
खटावमध्ये कोरोना संकट वाढले आहे. कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार गेली आहे. त्यामुळे बुधवारपासून (ता.28) पुन्हा एकदा नऊ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामपंचायत खटाव व दक्षता समितीने मंजूर केलेल्या ठरावात नऊ दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात येणार असून, यामध्ये वित्तीय संस्थांसहित सर्व व्यवहार बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. कर्फ्यू काळात नियमांचा भंग करताना कोणी आढळल्यास त्या व्यावसायिकावर वा व्यक्तीवर दोन हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी दिली.