खानापूर / वार्ताहर
प्रत्येक पाच वर्षांनी गावागावात रंगणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीचा खानापुरात आज गुलाल उडणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण शिकवणाऱया ग्रामपंचायतींची निवडणूक इर्षेची व शर्थीची म्हटली जाते. ग्रामीण भागातील गावगाडय़ाचे भवितव्य रंगणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी लागत आहे. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत घराघरातील भाऊबंदकीतील तसेच पै-पाहुणे नात्यातील गोतावळे जमा करून चुरशीची निवडणूक गेल्या 22 डिसेंबर रोजी पार पडली. अन् खानापूर तालुक्मयाच्या गल्लीबोळात या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी संपली होती. बुधवारी या रणधुमाळीचा निकाल असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
खानापूर तालुक्मयातील 51 ग्राम पंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्या. बऱयाच ठिकाणी अनेक जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. 79 जागा बिनविरोध निवडल्या असल्या तरी उर्वरित 623 पैकी 544 जागांसाठी 1719 उमेदवार शड्डू ठोकून उभे आहेत. या उमेदवारांचे भवितव्य बुधवारी ठरणार असून जो तो उमेदवार स्वतःला विजयाची खात्री देत असल्याने पाठीराख्यांची मात्र धाकधूक वाढली आहे. चुरशीने व इर्षेने प्रचार यंत्रणा हाती घेऊन घराघरात साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून निवडणुका झाल्या. विधानसभा, लोकसभा, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांमध्ये विशेषकरून इच्छुक उमेदवार मर्यादितपणे बाहेर पडतात. पण या निवडणुकीमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्याने इर्षेने अनेकजण गावगावात निवडणुकीदिवशी रस्त्यावर उतरले. अन् बुधवारच्या निकालाची वाट आठवडाभरापासून पाहिली.
बुधवारी सकाळी 8 वाजता खानापूर येथील सर्वोदया विद्यालयात तब्बल 81 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. तीन फेऱयांमध्ये होणाऱया मतमोजणीसाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून पहिल्या फेरीतील 14 पंचायतींचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार आहे. याच फेरीमध्ये अनेक उमेदवारांना समसमान अथवा एक-दोन मतांचा फरक दिसून आल्यास फेर मतमोजणीलाही सामोरे जावे लागेल, अशी शक्मयता निर्माण झाल्याने पहिल्या फेरीतील निकाल वेळीच लागेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरी फेरी दुपारच्या दरम्यान सुरू झाली तरी सायंकाळपर्यंत संपेल. मात्र तिसरी फेरी रात्री उशिरापर्यंत चालणार यात शंका नाही.
खानापूर तालुक्मयात ग्राम पंचायतींमधून चुरशीने निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे भवितव्य सध्या बंद पेटीत दडले आहे. सकाळी 8 पासून पहिल्या फेरीला सुरुवात होणार असल्यामुळे पाठीराख्यांची गर्दी राहणार आहे. खानापूर शहरामध्ये दिवसभर गुलालाची उधळण व जल्लोष दिसून येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. चुरशीने मतदान झालेल्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराकडून गुलाल आमचाच असा दावा करण्यात येत आहे. काही जणांकडून विजयाच्या उत्सवाची तयारीही चालू झाली आहे. ज्या उमेदवारांना पराभवाची चाहूल लागली आहे, त्यांच्यामध्ये नैराश्य पसरले आहे.
महिनाभरापासून ग्रामीण भागात ढवळून निघालेले राजकारण आता या ग्राम पंचायतीच्या निकालानंतर कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे. अनेक गावांमध्ये गटातटाचे राजकारण निर्माण झाले आहे. उमेदवारांनी स्वतः निवडून येण्यासाठी कधी भाऊबंदकीचा, कधी पै-पाहुणे, नातेवाईकांचा तर कधी युवा वर्गाचा आधार घेऊन निवडणूक लढवली आहे. पैशाची मोठय़ा प्रमाणात उधळण झाली आहे. दारू पार्टी यांचे महिनाभरात झालेले नियोजन पाहता अनेक ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाळीला मोठे उधाण आले. अखेरच्या दिवशी बऱयाच ठिकाणी मतदारांनीही विचारांती योग्य उमेदवारालाच मतदान केल्याची चर्चादेखील अनेक मतदान केंद्रांमध्ये दिसून येत आहे.
वास्तविक गावगाडय़ाचे नेतृत्व कुणाच्या हातात जाणार याबाबत तर्क-वितर्क गावागावातील चौकात सुरू आहे. या वेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिक प्रमाणात वाढला. त्यामुळे यापूर्वी सत्ता उपभोगलेल्यांच्या विरोधात शड्डू ठोकून अनेकजण रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात विशेषकरून युवकांचा सहभाग वाढला आहे.
खानापूर तालुक्मयात आरक्षणानुसार 51 टक्के महिलांचा सहभाग असला तरी यामध्ये अनेक ठिकाणी महिलांची टक्केवारी वाढेल, अशी शक्मयता निर्माण झाली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेत अनेक नियमावली निवडणूक आयोगाने घातल्या आहेत. त्यामुळे निवडणूक मतमोजणी प्रक्रिया या वेळेस वेगळी राहणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय अ वर्ग, ब वर्ग गटातील उमेदवारांचा निकाल झाल्यानंतर सामान्य गटातील उमेदवारांचा निकाल अंतिम राहणार आहे. त्यामुळे राखीव गटातील विरोधी उमेदवार सामान्य गटातील उमेदवारांपेक्षा अधिक मतदान घेऊन बरोबरीने गेल्यास त्याचा धोका सामान्य गटातील उमेदवाराला पोहोचू शकतो. यामुळे ग्राम पंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहील, हे सांगणे कठीण झाले आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक प्रति÷sची मानली जाते. प्रत्येक उमेदवाराने आपल्यापरीने प्रचार यंत्रणा राबवून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण निकालाबाबत प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच धाकधूक लागली आहे. अनेक गावांमध्ये पॅनेलप्रमाणे निवडणुका पार पडल्या, तर बऱयाच गावांमध्ये एकाकी प्रचार करून स्वतःला अधिक मते कशी आजमावता येतील, याकडे लक्ष घातले आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल यावेळी वेगळय़ाच दिशेने लागणार आहे. कारण एकाकी प्रचारामुळे मतांची आकडेवारी बदलणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने स्वतःलाच अधिक मते कशी पडतील, याचाच विचार केला आहे. त्यामुळे बुधवारी लागणाऱया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.