खानापूर / प्रतिनिधी
खानापुरात शिवस्मारकाच्या आवारात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी विशेष पुढाकार घेतला होता. यावेळी भाजपाचे युवा कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच हिंदू धर्म संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल तसेच पंडित ओगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची पूजा करुन पुष्पहार घातण्यात आला. यानंतर शिवस्मारकात अनेकांनी शिवप्रताप दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे केली. यावेळी किरण तुडयेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन शिवप्रताप दिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण सर्वांनी जपणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. यावेळी ऍड. आकाश अथणीकर म्हणाले, शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्म संपला असता.
यावेळी पंडित ओगले यांचेही भाषण झाले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब सावंत, अल्पसंख्याक घटकाचे तालुकाध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस, तालुकाध्यक्ष संजय कुबल यांनी देखील आपले विचार व्यक्त करुन प्रत्येक युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळय़ासमोर ठेवूनच आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन केले. शेवटी भाजपचे तालुका कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, रवि बडगेर, सुनिल नाईक, राज गावडे, दिलीप सोनटक्के, दत्ता वंजारी, विशाल कलबुर्गी, सोमनाथ गावडे, विनायक घाडी, संजय मयेकर, किरण अष्टेकर, संदीप शेमले, ज्ञानेश्वर गेजपतकर, संजय गुरव, ज्ञानेश्वर देवलत्तकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.