नदी-नाल्यातील पाणी पातळीतही घट : पाण्याखाली गेलेले पूल पुन्हा खुले ; हब्बनहट्टी स्वयंभू मारुती देवस्थानच्या कळसाचे झाले केवळ दर्शन
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्मयात पावसाचा जोर रविवारी दुपारनंतर ओसरला आहे. रात्री पावसाच्या थोडय़ाफार सरी पडल्या. त्यानंतर दुपारपासून काहीकाळ ऊनही पडले होते. गेल्या तीन-चार दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली होती. शनिवारी काहीकाळ खानापूर, निलावडा मार्गावरील मलप्रभा पुलावर पाणी आले होते. तोराळी जवळील मलप्रभेवरील दोन्ही पूलवजा बंधाऱयावर पाणी आले होते. हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती देवस्थानचा केवळ कळस दिसत होता. तर खानापूरला मलप्रभा नदीवरील घाटाच्या सर्व पायऱया बुडाल्या होत्या. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने नदी-नाल्यातील पाण्याची पातळी देखील झपाटय़ाने कमी होऊन पाण्याखाली गेलेले पूल पुन्हा खुले झाले आहेत. पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसात खानापूर शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर बऱयाच ठिकाणी खड्डे पडले आहेत.
खानापूर तालुक्यात मृगनक्षत्रात एवढा मोठा पाऊस कधीही झाला नव्हता असे ऐकिवात आहे. जवळपास 50 वर्षानंतर मृगनक्षत्राला मोठा पाऊस पडला असल्याचे बोलले जाते. गेल्या दि. 16 पासून मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. सतत तीन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारी पावसासह गडगडाटही झाला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर एकदमच कमी झाला. शनिवारी सायंकाळी मलप्रभा नदीचे पाणी पाहण्यासाठी मलप्रभा नदी घाटावर बरीच गर्दी झाली होती. निलावडे रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने शनिवारी दिवसभर निलावडे, मळवी, अंबोळी, कोकणवाडा, कबनाळी, मुगवडे आदी गावांचा संपर्क तुटला होता. पण सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुलावरचे पाणी पूर्णतः ओसरल्यानंतर गावांचा संपर्क सुरू झाला.
तलावही झाले तुडुंब
तालुक्यातील मलप्रभा व इतर नद्याबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेले सर्व तलावही तुडुंब झाले आहेत. तालुक्यातील शिवारही पाण्याखाली गेले आहे. मॉन्सूनच्या पहिल्या तडाख्याने शेतकऱयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही ठिकाणची पिकेही कुजून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवारात साचलेले पाणी लवकर कमी होणार नसल्याने भात लागवड करण्यास अडचण निर्माण होणार असून शेतकऱयांची चिंता वाढली आहे.
बंधाऱयात अडकलेली लाकडे काढण्यासाठी धावपळ
मलप्रभा नदीवर गेल्या दहा वर्षात जागोजागी पूलवजा बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यांने तोराळी गावाजवळ दोन, देवाचीहट्टी, मळवी, असोगा, खानापूर, जळगे, यडोगा, कामशिनकोप, हिरेहट्टीवळी प्रत्येकी एक अशा एकूण दहा पूलवजा बंधाऱयाचा समावेश आहे. कांजळे व खानापूर येथील महामार्गावर केवळ पूल बांधण्यात आले आहेत. पावसाळा आला की मलप्रभा नदी पात्राच्या आजुबाजूला असलेल्या जमिनीची पाण्यामुळे धूप होऊन त्या ठिकाणी असलेली झाडे, झुडपे तुटून पाण्यात पडतात. ती वाहून जाण्यासाठी बंधाऱयाच्या मुशी कमी पडत असल्याने प्रत्येक बंधाऱयात झाडे झुडपे अडकतातच. यामुळे पाण्याचा प्रवाह देखील त्या ठिकाणी अडून राहतो. व पुलावर पाणी येते. पुलावरचे पाणी कमी झाले की, बंधाऱयात अडकलेल्या झाडांचे ओंडके काढण्यासाठी त्या ठिकाणी एकच गर्दी होते. बरेच लोक बंधाऱयातून अडकलेले झाडांचे ओंडके काढून घेऊन जातात.
गेल्या चार दिवसात पडलेल्या पावसामुळे कांजळा व खानापूर महामार्गावरील पूल वगळता सर्व पूलवजा बंधाऱयात झाडांचे ओंडके अडकले आहेत. ते काढण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोकांची सध्या धावपळ सुरू झाली आहे. असोगाजवळील पूलवजा बंधाऱयात झाडांचे ओंडके आढळल्याने बंधाऱयातील पाणी आजुबाजूच्या शेतीवाडीत घुसून नुकसान झाले आहे. अखेर मायनर इरिगेशन विभागाने त्या ठिकाणी येऊन त्या बंधाऱयात अडकलेले झाडांचे ओंडके व कचरा बाजूला करुन बंधाऱयातून पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा केला.
19 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत
चोवीस तासात पडलेला पाऊस
खानापूर येथे 63 मि. मीटर, नागरगाळी 39 मि. मी, बिडी 44 मि. मी, कक्केरी 48 मि. मी, असोगा 74 मि. मी, गुंजी 62 मि. मी, लेंढा 66 मि. मी, जांबेटी 136 मि. मी, कणकुंबी 133 मि. मी. पावसाची नेंद झाली आहे.
रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत
चोवीस तासात पडलेला पाऊस
खानापूर 62 मि. मी, नागरगाळी 34 मि. मी, बिडी 49 मि. मी, कक्केरी 40 मि. मी, असोगा 74 मि. मी, गुंजी 78 मि. मी, लोंढा 105 मि. मी, जांबोटी 128 मि. मी, कणकुंबी 150 मि. मीटर इतका पाऊस पडला आहे.