प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. कचऱयाची उचल वेळेवर करण्यात येत नसल्याने या ठिकाणी कचऱयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारे गणाचारी गल्लीत कचऱयाचा ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱया नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे.
शहरात बहुतांशी भागात कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याने रस्त्यावर कचऱयाचे ढीग सर्वत्र पाहायला मिळत आहेत. शहराच्या अनेक भागात कचराकुंडीची व्यवस्था केली नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात कचऱयाचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे.
येथील रस्त्यावर कचरा टाकण्यात आल्याने येथून ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. कचऱयाचा ढीग रस्त्यावर पसरल्याने वाहनधारकांना कचऱयातूनच वाट काढावी लागत आहे. त्यामुळे येथील कचऱयाची उचल दररोज करावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.