फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गायकवाड : ‘तरुण भारत’चे नागरिकांनी मानले आभार
प्रतिनिधी /फलटण
सगळीकडेच गणेश विसर्जन सुरु असून फलटणमध्ये पाचव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन घाणीत करावे लागत असल्याची ‘तरूण भारत’ ने प्रसिद्ध केली होती. शदर बातमीची दखल घेऊन फलटण नगरपरिषदेने तत्काळ विसर्जन ठिकाणी साफसफाई करून हा परिसर स्वच्छ केला आहे. अनंत चतुर्थी यादिवशी नगरपरिषदेकडून विसर्जन व्यवस्था नियोजनबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत गणेशभक्तांनी ‘तरुण भारत’चे आभार मानले आहेत.
नाना पाटील चौक लगत असणाऱया निरा उजवा कॅनॉलमध्ये दिनांक 11 रोजी दीड दिवसाच्या तर दिनांक 14 रोजी 5 दिवसाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता नगरपरिषदेकडून करण्यात आली नव्हती. या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने विसर्जनास आलेल्या गणेशभक्तांनी नगरपरिषदेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत एकीकडे याबाबतचे सविस्तर फोटोसह वृत प्रसिद्ध करताच नगरपरिषदेकडून बातमीची दखल घेऊन विसर्जनाच्या ठिकाणी साफ सफाई करण्यात आली. दुसरीकडे विसर्जन ठिकाणच्या गैरसोयीबाबत ‘तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध केल्याबाबत अनेक गणेशभक्तांनी वृतपत्राचे आभार मानले.
अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने कृत्रीम तलावाची निर्मिती तसेच मूर्ती संकलनाची व्यवस्था करावी. याचबरोबर विसर्जनाच्या ठिकाणी साफ सफाई तसेच जंतू नाशकाची फवारणी करावी. नागरिकांना प्रबोधन करून कॅनॉल मध्ये टाकण्यात येणाऱया निर्माल्याचे संकलन करावे व विसर्जनासाठी नगरपरिषद कर्मचारी पथक नेमण्यात यावे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी अनंत चतुर्थी यादिवशी होणाऱया विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सुव्यवस्थित विसर्जन सोहळा पार पडेल अशी विसर्जन व्यवस्था करावी. गणेशमूर्तीचे विसर्जन नियोजनबद्ध होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गणेशभक्तांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आता अनंत चतुर्थी यादिवशी नगरपरिषदेकडून कोणत्या प्रकारची विसर्जन व्यवस्था करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.