ग्रामीण भागातील मुलांना गावांमध्येच शैक्षणिक सोय महत्वाची. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन. मयेतील महामाया हायस्कुलच्या विस्तारीत प्रकल्पाचे उदघाटन.
डिचोली/प्रतिनिधी
ग्रामीण भागात शैक्षणिक पातळीवर साधनसुविधा निर्माण होत आहेत हि समाधानाची आणि चांगली बाब आहे. गावातील मुलांना शिक्षण ग्रहण करण्यासाठी दूर जाणे भाग पडू नये व त्यांना सर्व शैक्षणिक सोयी सुविधा गावातच मिळाव्यात यासाठी मयेतील विजयानंद ज्ञानप्रकाश संस्थेने येथे निर्माण केलेली सुविधा कौतुकास्पद आहे. या संस्थेतील शिक्षणात तंत्रज्ञान व कौशल्य विकास शिक्षणावर भर देत गावतील मुलांना भवितव्याची तयारी करण्याची संधी संस्थेने उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.
अर्धवाडा मये येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री विजयानंद ज्ञानप्रसारक संस्थेच्या नूतन विस्तारीत इमारतीचे उदघाटन, महामाया माध्यमिक विद्यालयाचे स्थलांतरण कार्यक्रमात मुख्यमंत्री डा?. प्रमोद सावंत बोलत होते.
येथील महामाया विद्यालय संकुलात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डा?. सागर साळगांवकर (व्यवस्थापकीय संचालक जीनो फार्मास्य?टिकल), भागिरथ शेटय़? (अध्यक्ष, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), डा?. भानु मंजुनाथ (संचालक, सिजेन्टा बायोसायंसीक कंपनी), रुपेश ठाणेकर (अध्यक्ष विजयानंद ज्ञानप्रसारक संस्था व उपाध्यक्ष गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), दिलीप शेट (सरपंच, मये पंचायत), पंचसदस्या सुवर्णा तुळशीदास चोडणकर, उद्योजक- निळकंठ मराठे, शांबा पेडणेकर (माजी विद्यार्थी संघटना), उपसरपंच सुफला चोपडेकर आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाकडे आज लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या पालकांकडून मोठे दान घेऊन त्यांना विद्यालयात भरती करता येत नाही. तशी त्यांची परिस्थितीही नसते. उलट त्यांना शिक्षणासाठी मदत करावी लागते. अशा विद्यार्थी घटकाला अशा शैक्षणिक संस्था?मधून चांगली सेवा व शिक्षण उपलब्ध व्हावी, हिच अपेक्षा आहे. अवघ्या कालावधीतच शैक्षणिक आस्थापनासाठी सर्व साधनसुविधा उपलब्ध करून देणारी विजयानंद ज्ञानप्रसारक संस्था अग्रणी ठरली आहे. संस्थेचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱयांनी अथक परिश्रमाने आज ही संस्था नावारूपाला आली आहे. पुढच्या वषीपासून नवीन शैक्षणिक धोरण चालीस लागणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार गोव्यात शैक्षणिक क्रांती घडणार आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी संस्थेची सुत्रे हातात घेतल्यावर ही संस्था प्रगती पथावर नेऊन ठेवली. शैक्षणिकक्षेत्रा बरोबर या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री सर्वच बाबतीत आम्हाला पुर्ण सहकार्य करित आहेत. मये, म्हावळींगे येथिल जमीनीचा विषय व अन्य विषय सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रारंभी सोनू चोडणकर यांच्या घरातील लहानशा खोलीत सुरू करण्यात आलेले महामाया विद्यालय आज प्रगतीपथावर पोहोचले आहे. या संकुलासाठी सर्व ते सहकार्य करताना या भागाचा विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया. विजयानंद संस्था मयेचा अभिमान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले.
इतरही उपस्थित मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. यावेळी संकुलासाठी आर्थिकदृष्टय़ा मदत केलेले आश्रयदाते सागर साळगांवकर, डॉ. भानु मंजुनाथ, रुपेश ठाणेकर, निळकंठ मराठे, शांबा पेडणेकर यांचे मुख्यमंत्री डा?. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. आभार सागर च्यारी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पत्रे यांनी केले.