वीज समस्या दूर करण्याची मिळाली ग्वाही
आचरा / प्रतिनिधी-
चिंदर परिसरात गेले अनेक दिवस चाललेल्या विजेच्या खेळखंडोबाला वैतागून आचरा विद्युत कार्यालयावर भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली चिंदर विभाग भाजपच्या वतीने धडक देण्यात आली.
विभाग अभियंता श्री.मुगडे यांनि चिंदर गावच्या विद्युत समस्या पंधरा दिवसात दूर करण्यात येतील असे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी चिंदर भागातील अकार्यक्षम वीज कर्मचारी, तुटलेले पोल बदलणे, अनेक दिवस लाईट नसताना आकारण्यात येणारा विज आकार कमी करणे असे अनेक मुद्दे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गांवकर यांनी मांडले.