वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखले गावाजवळ रस्त्यावरून गावाकडे परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर झुडपात बसलेल्या अस्वलाने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव शंकर गोविंद गवस वय 50 असे असून त्याला उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती सदर शेतकरी शंकर गवस हा कणकुंबीला कामासाठी गेला होता पारवाड चिखले मार्गे तो पायी चालत येत असताना जंगलाच्या झुडपात दडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला त्यामध्ये सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून शेतकरी जागेवरच रक्तबंबाळ झाला अस्वलाने हल्ला केल्याचे लक्षात येतात जवळ असलेल्या काहींनी आरडाओरडा करतात अस्वल तेथून पळून गेले व गावच्या नागरिकांनी तातडीने त्यांना बेळगाव रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.