प्रतिनिधी/जत
शहरातील धानेश्वरी कॉलनीत पाण्याच्या मोटरीची पिन काढताना विजेचा धक्का लागून हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. सुभाष काडाप्पा तेली (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुभाष तेली यांचे मुळ गाव कर्नाटक रबकैबनट्टी येथील आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात ते काम करत होते. येथील वळसंग रोडवर चहाची टपरी होती. सकाळी सात वाजता आपल्या घरी पिण्याचे पाणी भरून झाल्यानंतर मोटरीची पिन काढत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. याची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस विजय वीर करत आहेत.