जमिनी विकण्याचे षडयंत्र : भाजपाच्या कृत्याचा काँग्रेस कडून निषेध जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोवा किनारी विभाग आराखडा निश्चीत करण्यासाठी सरकारने 8 जुलै रोजी आयोजीत कलेली जनसुनावणी म्हणजे निव्वळ दिखावा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गोव्याच्या भुमीचे तुकडे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी कल्बला विकण्याचे भाजपाचे छडयंत्र आहे. काँग्रेस त्याचा निषेध करीत असून जनसुनावणी त्वरीत रद्द करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केली आहे. सध्यास्थित जनसुनावणी घेणे म्हणजे भाजपा सरकार किती ढोंगी आहे हे स्पष्ट होत आहे असेही चोडणकर म्हणाले.
सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परीषदेत गिरीष चोडणकर बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत तुलीयो डिसोझा, ऍड. अर्चित नाईक व अन्य उपस्थित होते. राज्यातील भाजपा सरकार सध्या संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. कोविड19 च्या महासंकटाला समोरे जाण्यासाठी राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे, संचार बंदीही सुरु आहे, शिवाय राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केलेला असताना जनसुनावणी कशी घेता येईल असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला आहे. किनारी विभागाचा आराखडा आपल्याला हवा तसा करण्यासाठी व राज्यातील सुमारे 107 कि. मी. किनारी भाग विकण्यासाठी सरकार एक प्रकारे जनतेच्या डोक्यावर बंदुक धरून जनसुनावणी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस असे प्रकार होऊ देणार नाही. गरज भासल्यास सुनावणीच्या ठिकाणी निदर्शने करू असा इशार चोडणकर यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत पातळीवर जनसुनावणी व्हावी
कॉग्रेस जनसुनावणीला विरोध करीत नाही. मात्र जनसुनावणी घेण्याची वेळ आणि पध्दत योग्य नाही. जनसुनावणी होण्या अगोदर त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. लोकांना आपले मत माणण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे. हा प्रश्न किनारी भागात होणाऱया गावगावातील लोकांचा असल्याने जनसुनावणी ग्रामपंचायत पातळीवर होणे नितांत गरजेचे आहे. सरकारने जिल्हा पातळीवर आयोजीत केलेली जनसुनावणी म्हणजे केवळ दिखावा असून भाजप सरकारने गोवा विक्रीसाठी काढला आहे. गेली आठ वर्षे काहीच केले नाही आता ऐन अडचणीच्या काळात ही सुनावणी कशासाठी. म्ख्युमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नरेंद्र मोदींच्या ताटाखालचे मांजर बनले असून मोदींच्या इशाऱया नुसार शेपूट हलवत असल्याचा आरोही चोडणकर यांनी केला आहे.
सरकार जनतेच्या हितासाठी जनसुनावणी पुढे ढकलू शकते
गोव्यातील किनारी भागाशी स्थानिक लोकांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे त्यांचा तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री डॉ. सावत यांना जनतेच्या शक्तीचा अंदाज नाही. त्यांनी जनचेच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न करू नये तसेच करण्याचा प्रय़त्न केल्यास काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तीनिशी जनतेच्या मागे राहील असा इशाराही चोडणकर यांनी दिला आहे. सरकारला हवे असेल तर सरकार कोणतेही नियम बदलू शकते. कॉग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांना अपत्र करण्यासाठी काँग्रेस पक्षाने याचीका सादर केली होती, नंतर न्यायालयाने तीन मिहिन्याच्या आता प्रकरण निकालात काडा असा आदेश सभापतींना दिला होता. तब्बल 20 महिने पूर्ण झाले तरी सरकारने न्यायालयाला कोणतेच उत्तर दिले नव्हते. नंतर सरकारने कोविडचे कारण पुढे करून वेळ मारून नेली होती. सरकार खरोखरच जनतेसाठी काम करीत असले तर यावेळीही असेच कारण पुढे करून जनसुनावणी पुढे ढकलू शकते. सरकारने तसे करावे अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.