निपाणी नगरपालिकेच्या नियोजनाला नागरिकांचा प्रतिसादच नाही : चारच मूर्ती पालिका प्रशासनाकडे सुपूर्द
अमर गुरव /निपाणी
मंगळवारी पाच दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन निपाणी शहर व परिसरात पार पडले. यावेळी निपाणीत भाविकांनी मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याऐवजी कृत्रिम कुंडात विसर्जन करावी व पाण्याचे प्रदूषण टाळावे, या उद्देशाने नगरपालिकेने चार ते पाच ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती. मात्र याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. पालिकेने उभारलेल्या कृत्रिम कुंड तसेच बॅरलमध्ये केवळ चारच गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
निपाणी शहर व उपनगरात आठ ते नऊ हजार घरगुती गणेश मूर्तींची प्रति÷ापना करण्यात आली होती. पाच दिवस पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंगळवारी बहुतांशी गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. शहरातील गणेश मूर्तींची ही संख्या लक्षात घेऊन गणेशमूर्ती सार्वजनिक तसेच वैयक्तिक विहिरी, तलाव, खणी याठिकाणी विसर्जित करण्याऐवजी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात यासाठी पालिकेने नियोजन केले. त्यानुसार नगरपालिका नजीकच्या पार्किंग शेडमध्ये तसेच साखरवाडी, अंमलझरी रोड व दौलतनगर येथे पालिकेतर्फे कृत्रिम कुंड तसेच बॅरल ठेवण्यात आले होते.
मात्र येथे बहुतांशी भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले नाही. तीन ठिकाणी एकही गणेशमूर्ती पालिका प्रशासनाच्या कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित झाली नाही तर एका ठिकाणी केवळ चार मूर्त्या विसर्जित करण्यात आल्या. त्यामुळे पालिका प्रशासनाचे हे नियोजन फोल ठरल्याचे दिसून आले. सदर विसर्जन व्यवस्थेबाबत पालिकेने नागरिकांमध्ये कोणत्याच प्रकारची जागृती केली नव्हती. त्यामुळे शहरवासीयांना याची कल्पनाच आली नाही.
गेल्यावषीचा कटू अनुभव
दरम्यान गेल्यावषी पालिका प्रशासनाने गणेशमूर्ती दान उपक्रम राबवला होता. त्यावेळी चांगल्या प्रमाणात जागृती झाली. त्यामुळे भाविकांचा प्रतिसादही मिळाला. पण यावेळी भाविकांकडून घेतलेल्या गणेशमूर्त्या कचरा गाडीतून नेऊन पट्टणकुडी हद्दीतील कचरा डेपोमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मूर्तींची ही एक प्रकारे विटंबनाच असल्याचा आरोप करत भाविकांनी तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यामुळेही यंदा पालिकेच्या मूर्ती विसर्जनाच्या नियोजनाला शहरवासीयांनी साथ न दिल्याचे दिसून आले.
पालिका प्रशासनाचा दुजोरा
यासंदर्भात पालिकेचे आरोग्य निरीक्षक विवेक जोशी म्हणाले, नगरपालिकेने यंदा चार ठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम व्यवस्था निर्माण केली होती. मात्र येथे चार मूर्तींचे विसर्जन झाले. निर्माल्य मात्र मोठय़ा प्रमाणात गोळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
भावना दुखावल्यामुळेच अल्प प्रतिसाद
गेल्यावषी नगरपालिका प्रशासनाने गणेशमूर्तींची विटंबना केली होती. यातून गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तसेच शास्त्राsक्त पद्धतीने वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यासाठी श्रीराम सेना तसेच अन्य संघटनांच्यावतीने जनजागृती केली होती. त्यालाही प्रतिसाद देत नागरिकांनी वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, असे श्रीराम सेनेचे सचिव अमोल चेंडके यांनी सांगितले.