मतदार याद्यांसंदर्भात केली चर्चा : भाजप-काँग्रेस पक्ष प्रतिनिधींची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांची दुरुस्ती तसेच नवीन मतदारांची नावे दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मतदार याद्यांमधील सुधारणांबाबत चर्चा केली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजपचे माजी आमदार संजय पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे के. जी. पाटील यांच्यासह इतर पक्षांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. मतदार याद्यांमधील दुरुस्ती तसेच नावे कमी करणे, नव्याने नावे दाखल करणे या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. मतदारसंघातील मतदान पेंद्रांनुसार प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मतदारांची नावे तसेच त्यांच्या पत्त्याबाबत पाहणी करून काही चुका राहिल्यास तातडीने निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रारी दाखल कराव्यात. काही ठिकाणी नावे कमी झाली आहेत, त्या ठिकाणी त्यांची नावे दाखल करण्यासाठी नव्याने अर्ज भरावेत. ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले तरी त्यांची तातडीने दखल घेण्यात येत आहे. तरी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी विभागामध्ये मतदार याद्यांबाबत पडताळणी करावी, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावेळी सांगितले.