प्रतिनिधी / वारणानगर
सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकऱ्यांनी पोलीसांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे शेतात जाण्यासाठी मागितलेल्या परवान्यास मान्यता देणेसाठी जिल्हाधिकाऱ्यानी स्वयस्पष्ठ आदेश काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न, उत्पादन, शेती साधनांचे वितरण व किरकोळ विक्री, विविध कृषी यंत्रसामग्री व उपकरणे यांची विक्री इत्यादी कापणीसारख्या विविध कृषी कार्यात स्पष्टपणे स्पष्ट केले या अनुषंगाने महसूल व वनविभागाचे मुख्य सचिव अजय मेहता यानी दि. ४ मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी यांना काढलेल्या आदेशात शेतीसह शेतीपूरक उद्योग, कृषी यांत्रीक साहित्याची तसेच बी बीयांनाची दुकाने यांना गर्दी टाळण्यासाठी वेळ वाढवावा तसेच शेतकरी व शेतमजूर यांना पूर्णता या कामासाठी मुक्त मोकळीक मिळावी कोठेही अडवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यानी पोलीस यंत्रनेला आदेश द्यावेत, कृषी अधिकारी यानी पास द्यावेत असे आदेश दिले आहेत तथापी जिल्हा बंदीच्या नांवाखाली शासन शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे असे वास्तव वारणा नदीच्या तिरावरील दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरील गांवात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अनुभवायला मिळत आहे.
वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीसांच्या त्रासाला कंटाळून थेट जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शेतात जाण्याचा परवाना निवेदनाद्वारे मागितला यावर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यानी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी बैठक केल्यावर पन्हाळा उपविभागाचे प्राताधिकारी अमित माळी यांना हा प्रश्न सोडवण्यास सांगीतले आहे तथापी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी,पन्हाळा, हातकंणगले,शिरोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा,वाळवा, मिरज या सात तालुक्यातील वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील गांवातील शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात अलिकडे – पलीकडे करण्याचा प्रश्न भेडसावत आहे याचा शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचवणेसाठी जिल्हाधिकाऱ्यानी पोलीस अधिक्षक यांना शेतकऱ्यांची अडवणूक न होणे बद्दल स्वयस्पष्ठ आदेश काढण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
खरे बोलायला कोणच तयार नाही, शेतकरी मात्र भरडतोय
शेतकऱ्यांच्या अडवणूकी बाबत वरिष्ठानी वारणा नदीवर असलेल्या संबधीत पोलीस ठाणे अधिकारी व त्याच्या चेकपोष्टवर असलेल्या पोलीस कर्मच्याऱ्यांना विचारल्यावर कोल्हापूर बाजूचे आम्ही शेतकऱ्यांना अडवत नाही सांगली पोलीस अडवतात तर सांगली पोलीस कोल्हापूर पोलीस अडवतात असे सांगतात त्यामुळे वरिष्ठापुढे खरे बोलायला कोणच तयार नाही यामुळे सिमेवरील शेतकरी मात्र भरडला जात आ