स्तर 3 च्या निर्बंधांना 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने पॉझिटिव्हीटी दर 6.92 टक्के इतका खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा तिसऱया स्तरात समाविष्ट होत असल्याने 16 जुलैला लागू करण्यात आलेल्या आदेशाला 2 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
राज्यात कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सुरक्षित महाराष्ट्र निर्बंध स्तर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हय़ाचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार ठरविण्याबाबत व या पॉझिटिव्ह रेटनुसार जिह्याच्या निर्बंधाचा स्तर निश्चित करण्याच्या सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
जिह्यातील दोन सप्ताहातील प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर विचारात घेऊन स्तर निश्चित करण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना दिल्या आहेत. जिल्हय़ात 9 ते 15 जुलै या सप्ताहातील कोविडबाधित रुग्णांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे 7.42 टक्के आहे. 15 ते 21 जुलै या कालावधीतील सरासरी पॉझिटिव्हीटी रेट आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे 6.42 टक्के आहे. या रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटिव्हीटी रेट 6.92 टक्के असल्याने जिल्हा स्तर तीनमध्ये समाविष्ट होत आहे. त्यानुसार 16 जुलैला लागू करण्यात आलेल्या आदेशांना आता 2 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱया कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यावर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
…तर सिंधुदुर्ग लवकरच रेड झोनमधून बाहेर!
सिंधुदुर्ग जिल्हा ज्यावेळी रेड झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले, त्यावेळी जिह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर 32 टक्केपर्यंत आणि राज्यात सर्वाधिक होता. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्या वाढविल्या. एक जूनपासून दररोज पाच ते सहा हजार चाचण्या करण्यास सुरुवात केली. त्याचा चांगला परिणाम होऊन रुग्णसंख्येत घट होत गेली. गेल्या दीड महिन्यानंतर जिह्याचा पॉझिटिव्हीटी दर 6 .92 टक्के इतका खाली आल्याने दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्येत आणखी घट होऊन पॉझिटिव्हीटी दर पाच टक्केच्या खाली आल्यास जिल्हा दुसऱया स्तरात समाविष्ट होईल आणि रेड झोनमधूनही बाहेर पडू शकतो. यासाठी नागरिकांनी कोरोना चाचण्या न घाबरता कराव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.