प्रतिनिधी/सातारा
पावसाळय़ाला सुरूवात होताच साथीच्या आजारांना ही निमंत्रण मिळत असते. डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीचा उद्भव होत असतो. सातारा जिह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यात चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या कराड, सातारा, पाटण आणि फलटण, खटाव या पाच तालुक्यात प्रार्दुभाव झाला होता. त्यामध्ये तब्बल चिकुनगुनिया, डेंग्यू यामुळे 124 जणांना बाधा झाली होती. येथील साथी नियंत्रणात आल्या आहेत. तेथे हिवताप कार्यालयाच्यावतीने जावून प्रबोधन करण्यात आले. नागरिकांना कोरडा पाळण्याचे व डास उत्पती केंद्रे नष्ट करण्यासाठी जिल्हा हिवताप केंद्राच्यावतीने मेहिम आखली गेली.
पावसाळय़ात साथजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. अगोदरच कोरोनाच्या साथीने सगळय़ा जगावर संकट आलेले असताना डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप असेही साथजन्य आजार जिह्यात आपले डोके काही ठिकाणी वर काढताना दिसत आहेत. त्यामध्ये खटाव तालुक्यातील एनकुळ येथे दि. 28 डिसेंबरला 8 जणांना चिकुनगुनिया लागण झाली होती. त्यातील पाच जणांचे रक्ताचे नमुने तपासले. कराड तालुक्यातील वाठार येथे दि. 11 जानेवारीला साथ उद्भवली होती. 30 जणांना लागण झाली होती. तसेच आटके येथे डेंग्यूची 10 फेब्रुवारीला 7 जणांना बाधा झाली होती. मुंढे येथील 16 जणांना चिकुनगुनियाची 5 फेब्रुवारीला बाधा झाली होती. कोळैवाडीतील 13 जणांना दि. 3 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती. कासारशिरंबे येथील 10 जणांना दि. 5 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती. फलटण तालुक्यातील तडवळे येथे 7 जणांना दि. 15 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती.
सातारा तालुक्यातील धनगरवाडीत दि. 8 जुनला तापाचे दोन रुग्ण आढळून आले होते. कोडोली येथे दि. 8 जुनला 7 जण डेंग्युचे आढळून आले होते. कराड तालुक्यातील उंब्रज येथे दि. 9 जुनला 6 जण डेंग्यूने बाधित होते तर फलटण तालुक्यातील जिंती येथे दि. 21 जुनला 3 जणांना डेंग्यूची बाधा झाली होती, असे जिह्यात सात महिन्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे 126 जण रुग्ण होते.
सातारा पालिकेच्यावतीने साथरोग नियंत्रण जनजागर मोहिम
सातारा नगरपरिषद आरोग्य विभागातर्फे ‘साथ रोग नियंत्रण जनजागर मोहिम-2021’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पावसाळय़ा दरम्यान डेंग्यू, चिकनगुनीया, मलेरिया, हिवतापसारखे आजार डोकेवर काढण्याची शक्यता असते. या मोहिमेअंतर्गत विविध नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये घराच्या सभोवताली असणारे खड्डे बुजविणे, गटारी वाहती ठेवणे गरजेचे आहे. तसेच इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावित. संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे व घराची दारे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळय़ा बसविणे व झोपताना डास प्रतिबंधक क्रिम, अगरबत्ती यांचा वापर करावा, असे आवाहन सातारा पालिकेच्यावतीने नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.
नागरिकांनी कोरडा पाळावा
घरातील टायर, भंगार सामान, निकामी डबे, बाटल्या, प्लास्टिक साहित्या यांची विल्हेवाट लावावी. घरातील कुलर, फुलदाण्या वेळीस स्वच्छ करून कोरडे ठेवावे. तसेच घरातील व घरासभोवतालची रांजण, बॅरल, हौद यासारखे पाण्याचे साठे व्यवस्थित कापडाने झाकुण ठेवावे. आठवडय़ातून एकदा घासून पुसून स्वच्छ करणे आणि एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डासांच्या चाव्यापासून व्यक्तिगत संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच दैनंदिन पिण्याचे पाणी गाळून, उकळून प्यावे,
अश्विनी जंगम,
जिल्हा हिवताप अधिकारी