धर्मनाथ भवन येथे पुरोहित संमेलन उत्साहात : बेळगाव, जमखंडीसह विविध विभागातून 100 हून अधिक पुजारी उपस्थित
प्रतिनिधी /बेळगाव
जैन समाजाच्या विकासात पुरोहितांची भूमिका महत्त्वाची असून, पुरोहितांना मुख्य वाहिनीवर आणण्याची जबाबदारी जैन समाजाची आहे, असे मत ज्येष्ट पत्रकार कुंतिनाथ कलमानी यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील धर्मनाथ भवन येथे मंगळवारी झालेल्या पुरोहित संमेलनामध्ये ते प्रमुख पाहुणे होते. जैनबसदीमध्ये दररोज पूजा, पुराण, धार्मिक समारंभ, पंचकलय महामहोत्सव, विवाह, मुंजी यासह सर्व कार्यांसाठी पुरोहितांची आवश्यकता असते. त्यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
जैन युवा संघटनेचे अभय अवलक्की यांनी समाजातील प्रचलित परिस्थितीबद्दल पुजाऱयांशी संवाद साधून ही माहिती जैन युवा संघटनेला दिल्यास जैन समाजाचा अधिक विकास होऊ शकतो. संबंधित जिल्हय़ातील जैन पुरोहितांची संख्या अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे सोय होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. या समारंभाचे आयोजन प्रतिष्ताचार्य बाहुबली, अलागुरु, प्रतिष्ताचार्य आनंद उपाध्याय, प्रतिष्ताचार्य आदिनाथ उपाध्याय, प्रतिष्ताचार्य, शांतिनाथ उपाध्याय, यांचा मार्गदर्शनात वेद, ज्योतिषशास्त्र, पूजा पाठ, भाषा, संस्कृत, प्राकृत पठण, आणि पुरोहितसह-अस्तित्व-गरज, सुविधा, शास्त्र निर्मिती-आदी विषयावर चर्चा झाली.
माजी उपमहापौर सतीश गौरगोंडा यांनी आपले मत व्यक्त केले. व्यासपीठावर जितोचे अध्यक्ष पुष्पक हणमण्णवर, धर्मनाथ जैन मंदिराचे अध्यक्ष जितेंद्र आगसिमनी, माणिकबाग दिगंबर, जैन बोर्डिंगच्या सचिव सन्मती कस्तुरी, उदय उपाध्याय आदी उपस्थित होते.
शांतीनाथ उपाध्याय यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बाहुबली उपाध्याय, शेडबाळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पार्श्वनाथ उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप उपाध्याय यांनी केले. या परिषदेला बेळगाव, जमखंडी, विविध विभागातून 100 हून अधिक पुजारी उपस्थित होते.