प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटजवळ बॅरिकेड्स घालून येण्या-जाण्याचा सार्वजनिक रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम टिळकवाडीचा संपर्क तुटला आहे. हे बॅरिकेड्स त्वरित हटवावेत, यासाठी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी आंदोलन केले.
सदर बॅरिकेड्समुळे वाहनधारक, विद्यार्थी, व्यापारी, रिक्षाचालक, दिव्यांग, ज्ये÷ नागरिकांची गैरसोय होत आहे. गुराख्यांना येथून जनावरे नेणे जिकिरीचे होत आहे. दोन्ही बाजूने सुसाट वाहने धावत असल्याने जनावरे भांबावून जातात. त्यामुळे अनर्थ उद्भवू शकतो. कलामंदिर येथील भाजी मंडईत येण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत असल्याने गैरसोय होत आहे.
देशमुख रोडवरून काँग्रेस रोडवर ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहतुकीच्या सोयीसाठी बॅरिकेड्स लावले आहेत. ही केवळ धूळफेक आहे. लवकरात लवकर हे बॅरिकेड्स काढावेत, गतिरोधक बसवावेत, पोलीस नेमावेत व सिग्नल पूर्ववत चालू करावेत, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.