प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी हापूसच्या धर्तीवर ठाण्यातील आंब्यांना भौगोलिक निर्देशक (जीआय) टॅग मिळाला आह़े ठाणे जिह्यातील हापूस उत्पादक शेतकऱयांच्या फळाला भौगोलिक-टॅग मिळाल्यामुळे ठाण्यातील आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळणार आह़े जीआय टॅगमुळे ग्राहकांना आता अस्सल ठाणे जिह्यातील हापूस आंब्याची चव चाखता येणार आह़े
रत्नागिरी हापूसच्या धर्तीवर ठाण्यातील आंब्यांना भौगोलिक निर्देशक (जीआय) टॅग मिळावा, यासाठी ठाण्यातील अनेक आंबा उत्पादकांनी नुकतेच राज्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधला होत़ा जीआय टॅगिंगमुळे ग्राहकांना आंब्याची गुणवत्ता हमीची सुनिश्चितता होणार आह़े युरोप आणि अमेरिका या आंब्याच्या निर्यातीला प्राधान्य देईल आणि त्यामुळे आंबा उत्पादक बागायतदारांचा जास्तीत-जास्त नफा होणार आह़े
यावर्षी पहिल्यांदाच ठाणे जिह्यातील आंबा उत्पादक बागायतदारांनी त्यांचे उत्पादन जिओ-टॅगींगसाठी नोंदणी करण्यासाठी रस दाखवला होत़ा एकूण 118 हापूस उत्पादक शेतकऱयांनी नुकताच जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधल़ा. चव आणि सुगंधामुळे कोकण हापूसला जास्त मागणी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून त्याला जीओ टॅग मिळाला आहे. ठाणे हा जिल्हा किनारपट्टीवरील कोकण विभागाचाच एक भाग आहे, मात्र आंब्याच्या उत्पादन व निर्यातीमध्ये मागे राहिला होत़ा, अशी माहिती कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिल़ी जीओ-टँगिगसाठी नोंदणी केल्यानंतर सर्व आंब्यावरती एक कोड असेल जो फळांचा पूर्ण तपशील देईल़ कर्नाटक आणि गुजरातमधील येणारे काही आंबे हापूस म्हणून विकले जातात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक व बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते, अशी माहिती एका बागायतदारांने दिल़ी
जी-आय टॅगिंगविषयी शाहपूरचे बागायतदार एकनाथ तरमळे म्हणाले की, आमची बाजारपेठ सध्या मोठय़ा प्रमाणात फक्त कल्याण किंवा मुंबईपर्यंतच मर्यादित आह़े येथे उत्पादित होणाऱया हापूसची विक्री कमी किंमतीमध्ये होत़े. आम्ही साधारणपणे सुमारे 350-400 रुपये डझन याप्रमाणे आंब्याची विक्री करत़ो एकदा जीआय टॅग केल्यानंतर तेच उत्पादन जागतिक बाजारपेठेत जास्त किंमतीला विकू शकते. तसेच ग्राहकांना अस्सल उत्पादनही मिळणार आह़े