सरकारचा तोडगा, ई-कॉमर्स क्षेत्राला होणार फायदा : प्रदूषण मात्रेत होणार घट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
डिलिव्हरीकरीता लागणाऱया गाडय़ा शून्य प्रदूषणवाल्या वापरण्याकरीता सरकार प्रोत्साहन देणार आहे. या अंतर्गत सरकारने ‘शून्य’ नावाचे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या ऑर्डर्सचा पुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर यापुढे भर दिला जाणार आहे. निती आयोगाच्या बैठकीत सदरविषयी निर्णय घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या जास्तीत जास्त वापरासाठी सरकार ग्राहक व उद्योग यांच्यासोबत काम करणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल व प्रदूषण मात्रेत घट होण्यास मदत होईल, असे निती आयोगाने म्हटले आहे.
महिंद्रा, टाटा, झोमॅटो, बिग बास्केट यांची उपस्थिती
निती आयोगाचे सीईओ अभिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी वरील उद्गार काढले. या बैठकीत महिंद्रा इलेक्ट्रिक, टाटा मोटर्स, झोमॅटो, अशोक लेलँड, सन मोबिलिटी, लाईटनिंग लॉजिस्टिक्स, बिग बास्केट, ब्ल्यू डार्ट, हिरो इलेक्ट्रिक व स्विगी या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. येणाऱया काळात आणखी काही कंपन्या सरकारच्या नव्या शून्य अभियानात सहभागी होणार असल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले आहे.
ट्रकिंग करून माहिती मिळवणार
अभियानाकरीता ऑनलाईन ट्रकिंग प्लॅटफॉर्म बनवला जाणार असून इलेक्ट्रिक गाडय़ांचे मायलेज, किती कार्बन उत्सर्जन होत आहे व इतर फायदे लक्षात घेतले जाणार आहेत.
मालवाहतूक गाडय़ांमुळे प्रदूषण
मालवाहतुकीसाठीच्या गाडय़ांमुळे 10 टक्के इतके कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण हवेत पसरत असते.