आयआयटी आंदोलकांचा सरकारला इशारा, मेळावलीवासीय बनले आक्रमक
वाळपई / प्रतिनिधी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे सोमवारी बोलणी फिसकटल्यानंतर मंगळवारी पुन्हा आयआयटी सीमांकन कामाला शेळ मेळावली येथील आंदोलकांनी विरोध केला. सीमांकन कर्मचाऱयांना सकाळपासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत नागरिकांनी रोखून धरले. शेवटी त्या यंत्रणेनेच तेथून काढता पाय घतला. सीमांकन कामाला अडथळा केल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱयांनी वाळपई पोलीस स्थानकावर केलेली आहे. आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांना वाळपई पोलीस स्थानकावर बोलावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित पंचायतक्षेत्रातील सर्व गावातील लोक जेलभरो आंदोलन करतील, संपूर्ण गोव्यातील पोलिसस्थानके त्यावेळी कमी पडतील, असाही इशारा देण्यात आला आहे.
जोपर्यंत आयआयटी विरोधकांनी सरकारला सादर केलेल्या निवेदनासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार होत नाही, तोपर्यंत प्रकल्पाच्या सीमांकन कामाला विरोध सुरुच राहणार आहे, असा इशारा आंदोलकांकडून सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीनंतर देण्यात आला होता. त्यानुसार काल मंगळवारीही आंदोलन झाले.
सकाळपासूनच रोखून धरले सीमांकन
मंगळवारी सकाळी या कामाला विरोध होण्याची शक्मयता असल्यामुळे मुरमुणे धनगरवाडा याठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी 9.30 वाजल्यापासून सदर भागाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. ठरल्याप्रमाणे जवळपास साडेतीनशेच्या आसपास आयआयटी विरोधक रस्त्यावर उतरले होते. जोपर्यंत या भागातील नागरिकांच्या नावावर जमीन मालकी हक्क प्रस्थापित होत नाही. तोपर्यंत सरकारने आयआयटीच्या कामाला प्रारंभ करू नये, अशा प्रकारची एकमुखी मागणी आंदोलकांनी सरकारी यंत्रणेसमोर लावून धरली. आम्हाला आयआयटी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नकोच, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काम बंद पाडल्याने आंदोलनस्थळी तणावग्रस्त वातावरण होते.
आंदोलकांचा अधिकाऱयांशी आक्रमक पवित्रा
तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर, पोलीस उपधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी सरकारी कामाला अडथळा निर्माण होत असल्यामुळे कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. मात्र आंदोलकांनी विरोध करत सांगितले की आतापर्यंत सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे. आमच्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा, मात्र आम्ही सीमांकन कामाला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणार आहोत.
सीमांकन कर्मचाऱयांनी घेतली माघार
सकाळी 9.30 वाजता सीमाकंन करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱयांना दुपारी अडीच वाजेपर्यंत रोखून धरण्यात आल्यानंतर यासंदर्भातील तक्रार संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी वाळपई पोलिसस्थानकावर दिली. त्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व इतर सरकारी यंत्रणेने सीमांकन करणाऱया कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी त्याला जोरदारपणे विरोध करून त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी अडवून धरण्यात आले. यामुळे बऱयाच प्रमाणात झटापटी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यानंतर अचानकपणे सरकारच्या यंत्रणेने घटनास्थळावरून माघार घेत परत जाण्याचा निर्णय घेतला.
आयआयटी, आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा
सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलनात मोठमोठय़ा घोषणांनी व सरकारच्या यंत्रणेचा निषेध करीत आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केला. अनेकजणांनी सरकारने आमच्यावर अन्याय चालविल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आयआयटी प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आयआयटी विरोधात आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे वाळपई काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परब, महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई, उषा च्यारी, उन्नती मेळेकर व इतरांनी चर्चा करण्यासाठी आलेल्या सरकारी यंत्रणेसमोर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पामुळे याभागातील जैवविविधता पूर्णपणे नष्ट होणार असून येणाऱया काळात शेकडो प्रश्न निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे हा प्रकल्प या भागातून हद्दपार करावा, अशी जोरदार मागणी केली.
नव्या दहा हजार कुटुंबांची भरती कशासाठी?
सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीमध्ये सरकारने या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरीच्या याभागांमध्ये दहा हजार नव्या कुटुंबांचे वास्तव्य होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावर आक्रमक भूमिका घेताना आंदोलनकर्त्यांनी सदर कुटुंबांची भरती कुणाच्या भल्यासाठी? असा सवाल केला. या प्रकल्पामुळे या भागातील पर्यावरण पूर्णपणे नष्ट होणार असून काँक्रिटची जंगले उभी राहणार आहेत. येणाऱया काळातील या भागाचे दुर्दैवी चित्र आताच दृष्टिपथात येत असून हे आंदोलन आता शेळ मेळावली, पैकुळ, मैगिणे, धडा या गावांपुरतेच मर्यादित राहिलेला नसून संबंध सत्तरी तालुक्मयांमध्ये पेटणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.
सरकारला देव निश्चितच धडा शिकवणार : आंदोलक
मंगळवारी सहा तास चाललेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने घटनास्थळावरून माघार घेतल्यामुळे आंदोलकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याचा संशय त्यांच्या मनात आहे. कोणत्याही क्षणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंद होण्याची शक्मयता असल्याने आक्रमक भूमिका घेताना आंदोलनकर्त्यांनी एकाही आंदोलनकर्त्यावर गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न झाल्यास हजारोंच्या संख्येने वाळपई पोलिसस्थानकावर जेलभरो करण्याचा इशारा देण्यात आला. तसे झाले तर गोव्यातील अनेक पोलिसस्थानकेही कमी पडतील. त्यामुळे असला मूर्खपणा सरकारने करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. गोरगरीब जनतेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, हे खरेच दुर्दैव दुर्दैव आहे. असे दुष्कर्म करणाऱया सरकारला देव निश्चितच धडा शिकवेल, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
दशरथ मांद्रेकर, विश्वेष परब यांना अटक
दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा आयआयटी आंदोलनाला खतपाणी घालून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी वाळपई मतदारसंघ काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर व आम आदमी पार्टीचे विशेष परब या दोघांनाही भारतीय दंड संहिता कलम 353 खाली वाळपई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. रात्री घडलेल्या या घडामोडीमुळे आज बुधवारी यासंदर्भात आंदोलनाला बऱयाच प्रमाणात कलाटणी मिळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. मंगळवारी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यास आयआयटी विरोधक वाळपई जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यात रात्री ही अटक करण्यात आल्याने वातावरणाशी चिघळण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.