प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरांतील जमिनी बळकावल्यानंतर बुडाचा डोळा आता ग्रामीण भागातील तिबारपिकी जमिनीवर आहे. मनमानी कारभार करत आणि कोणालाही विश्वासात न घेता बुडा जमिनी ताब्यात घेत आहे. यापुढे तालुक्मयातील कोणत्याही गावातील जमिनी घ्यायच्या असतील तर तालुका पंचायत, ग्राम पंचायतमधील ना हरकतपत्र बंधनकारक असून संबंधित ग्राम पंचायत आणि तालुका पंचायतची परवानगी घेऊनच जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी. सध्या ज्या जमिनी घेण्यात आल्या आहेत त्यासंदर्भात नोटीस पाठवून जाब विचारावा, असा ठराव तालुका पंचायतच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उदय सिद्दण्णावर, सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, आप्पासाहेब किर्तने आदींनी हा विषय उचलून धरत शेतकऱयांच्या समस्या मांडल्या. बेळगावलगत असणाऱया उपनगरांतील सर्व जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. गरीब शेतकऱयांच्या जमिनी घेऊन त्या जमिनीत प्लॉट पाडून त्यांची विक्री श्रीमंतांना केली जाते. गरिबांना ते प्लॉट घेणे अशक्मय आहे. त्यामुळे बुडा श्रीमंतांसाठीच काम करते का? असा संतप्त सवालदेखील करण्यात आला.
बेळगाव तालुक्मयातील 28 गावे बुडामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, या गावांचा समावेश बुडामध्ये झाला तर येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी बुडा प्रयत्न करणार आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ग्रामीण भागातील कोणत्याही जमिनी बळकावण्याआधी ग्राम पंचायत किंवा तालुका पंचायतचे ना-हरकतपत्र घेणे बंधनकारक करा, असा ठराव करण्यात आला.
तालुका पंचायतच्या सभागृहात ही सभा पार पडली. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर मारुती सनदी व तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी होते. सदस्य सुनील अष्टेकर, उदय सिद्दण्णावर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, यल्लाप्पा कोलकार, आप्पासाहेब किर्तने, नीना काकतकर, लक्ष्मी मेत्री आदी उपस्थित होते.
पुतळय़ाचे राजकारण करून नेत्यांनी केली दिशाभूल
राष्ट्रपुरुषांच्या पुतळय़ांचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला आहे. मात्र, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱयांवर कारवाई करावी. याचबरोबर ज्या नेत्यांनी तेढ निर्माण केली आहे अशांवरही कारवाई करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
भाषिक अल्पसंख्याक कार्यालय बेळगावातच राहू दे
बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय हलविण्यासाठी सरकार घाट घालत आहे. हे कार्यालय चेन्नई येथे हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बेळगाव सीमाभागात भाषिक अल्पसंख्याक अधिक प्रमाणात राहतात. येथील नागरिकांकडून मराठी अधिक प्रमाणात बोलले जाते. तरीही येथील नागरिकांवर होणारे अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी भाषिक अल्पसंख्याक कार्यालय बेळगावातच राहू दे, असा ठरावही यावेळी करण्यात आला.
डॉ. संजीव डुमगोळ यांचे अभिनंदन
तालुका आरोग्याधिकारी म्हणून डॉ. संजीव डुमगोळ उत्तम काम पाहत आहेत. कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी 24 तास काम केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. स्वतःचा जीव धोक्मयात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठीची त्यांची धडपड उल्लेखनीय असून त्यांचे सर्वांच्यावतीने सभागृहात अभिनंदन करण्यात आले.