तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रमाला महत्त्व येत आहे. यात लहान मुले, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि सर्वच घटक येतात. संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणात अव्वल असलेल्या महाराष्ट्रालादेखील लसीकरण अद्याप आव्हान स्वरूपातच असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 29 लाख असून यापैकी निव्वळ 31 लाख 39 हजार 154 जणांचे लसीकरण करण्यात आले असे मे महिन्याच्या शेवटच्या रविवारची आकडेवारी सांगते. दरम्यान 29 मे रोजी 55,843 एवढे लसीकरण करण्यात आले. हा अपवाद वगळल्यास मुंबईतील लसीकरण दररोज 40 हजाराच्या आसपास होत असल्याचे आकडेवारी सांगत आहे. 28 मे रोजी 43 हजार, 27 मे रोजी 41 हजार तर 26 मे रोजी 34 हजार असे लसीकरण झाले. लसीकरण सुरु होण्या आधी दररोज 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्टय़ पालिकेने समोर ठेवले होते. शहरातील लसीकरण त्यातल्या त्यात चांगले होत असले तरीही ग्रामीण भागात अद्यापही लसीकरण मंदावलेले आहे. दरम्यान राज्यातदेखील लसीकरण संथ गतीने सुरू असून लस तुटवडा हेच याला एकमेव कारण सांगितले जात आहे. राज्यात रविवारपर्यंत 7.6 टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही मात्रांचे लसीकरण करण्यात आले तर 34 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच 45 वर्षावरील अडीच कोटी लाभार्थी लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्या शिवाय काही आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाइन वर्कर्सनादेखील दुसऱया लसीची मात्रा देण्यात आलेली नाही. यात 1.38 लाख आरोग्य कर्मचारी कोविशील्डच्या दुसऱया डोसच्या आणि 23 हजार आरोग्य कर्मचारी कोवॅक्सीनच्या दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर राज्यातील 16.49 लाख प्रंटलाइन कर्मचाऱयांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यात 89 हजार प्रंटलाइन कर्मचारी दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी पाडे, रेड लाईट एरिया, निराधार लोक अशा सारख्या वंचित घटकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता नसून यावर अद्याप कोणीच बोलत नाही. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लाटेच्या अनुषंगाने तज्ञांचा टास्क फोर्स तयार करणे, गाईड लाईन बदलणे, नियम शिथिल करणे, ऑक्सिजन पुरवठा करणे, रेमेडिसवीर उपलब्ध करणे अशा पातळ्यांवर ठोस निर्णय होत असल्याची सकारात्मक बाब असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एकमेव शस्त्र असलेल्या लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा यातच गति दिसून येत नाही.
राज्य सरकार नेहमी 12 कोटी लस देण्याची क्षमता ठेवत असल्याचे सांगत आहे. मात्र ती उपलब्ध करून देण्यास केंद्राकडून हेळसांड होत असल्यास त्यावर मार्ग शोधणे आवश्यक आहे. हाफकिनमध्ये लस निर्मिती करण्याचे ठरले, पण त्यापुढे लस उत्पादन सुरु झाले का यावर उत्तर मिळत नाही. कोरोनाच्या पहिल्या दुसऱया आणि आता येणाऱया तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे महत्त्व पटलेल्या लोकांना लसीकरणासाठी असे झुलवत ठेवणे म्हणजे कालांतराने लसीकरणात शिथिलता येण्याचा धोका अधिक आहे. लस देऊन लोकांना सुरक्षित केल्यास त्यांना संसर्गाचे प्रमाण कमी होईल. कोविड आजारातील गुंतागुत वाढणार नाही. एकाकडून दुसऱयाला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल. सध्या राज्यातील बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे आणि बाधित होण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. नेमकी हीच वेळ लसीकरणाच्या दिशेने वेगाने पावले उचलण्याची आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लहान मुलांना लस देण्यावरून मतमतांतरे आहेत. परदेशात मात्र लहान मुलांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परदेशात लहान मुलांना लस दिल्यावर दुष्परिणाम झाले असल्याची उदाहरणे समोर आली नाहीत. तरीही मुलांच्या लसीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसून येत नाही. मुलांच्या क्लिनिकल ट्रायल जूनपासून सुरू होणार असले तरी याचे क्लिनिकल ट्रायलचे एकमेव केंद्र नागपूर येथे आहे. तर दुसऱया बाजूला गर्भवतींना लस देण्याचा निर्णयदेखील बऱयाच उशिरा घेण्यात आला. गर्भवतींना लसीकरण सुरु असले तरी याचे प्रमाण उल्लेख करण्याएवढेदेखील नाही. याला कारण म्हणजे केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्रशासन यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. स्त्राrरोग तज्ञाच्या द फेडरेशन ऑफ ऑब्स्टट्रिक अँड गायनॉकॉलिजिस्ट सोसायटीज ऑफ इंडिया (फॉगजी) या संघटनेने गर्भवतींना लसीकरण करावे असे निवेदन केंद्र सरकारला दिले आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारतर्फे स्तनदा मातांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली तर गर्भवती मातांना लस देण्यावर अभ्यास सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र फॉगसी संघाकडून गर्भवती आणि स्तनदा माता अशा दोघीनाही लस द्यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. केंद्राची भूमिका अशी असताना राज्याने मात्र सावध भूमिका घेत गर्भवतीने स्त्राrरोगतज्ञांशी बोलून लस घेऊ शकता अशी भूमिका घेतली आहे. स्तनदा मातांना मात्र लस देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच यावरदेखील कोणतीही ठोस भूमिका नसल्याचे दिसून येते.
तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रमाला महत्त्व येत आहे. यात लहान मुले, गर्भवती महिला, स्तनदा माता, जोखमीच्या आजारातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, प्रंट लाईन वर्कर, तरुण असे सर्वच घटक येतात. संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणात अव्वल असलेल्या महाराष्ट्रालादेखील लसीकरण अद्याप आव्हान स्वरूपातच असल्याचे दिसून येत आहे. गतिमान लसीकरणास लसीचा न होणारा पुरवठा हाच सध्या प्रमुख अडथळा असून त्यावर वेळीच मार्ग काढण्यात आला नाही तर तिसऱया लाटेचा सौम्य धोका मोसमी पावसाच्या तोंडावर रौद्र रूप धारण करू शकतो जे कोणालाच परवडणारे नसेल.