‘एसबीआय’च्या अहवालात भाकित- दुसऱया लाटेप्रमाणेच भविष्यकाळही धोकादायक ठरण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाची तिसरी लाट दुसऱयाइतकीच धोकादायक असू शकते असे भाकित ‘एसबीआय’च्या अहवालात वर्तवण्यात आले आहे. या तिसऱया लाटेत किमान 98 दिवसांपर्यंत संकटकाळ असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. भारतातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसत आहे, परंतु तिसऱया लाटेचा धोका सतत वाढत आहे. एसबीआयच्या अहवालानुसार, देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट दुसऱया लाटेप्रमाणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय अनुभवांच्या आधारे ‘एसबीआय इकोरॅप’ने आपल्या अहवालात बरेच अंदाज व्यक्त केले आहेत. तिसऱया लाटेचा परिणाम दुसऱया लाटेच्या तुलनेत फारसा वेगळा असणार नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या तयारीमुळे तिसऱया लाटेतील मृत्यू कमी होऊ शकतात. दुसऱया लाटेचा धडा घेत विविध राज्यांनी आणि केंद्र सरकारने तिसऱया लाटेला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे, अशावेळी तिसऱया लाटेबाबतचा हा अंदाज खूप महत्वाचा ठरतो. जगातील अव्वल देशांमध्ये तिसरी लाट सरासरी 98 दिवस तर दुसरी लाट 108 दिवस चालली असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
‘एसबीआय’ अहवालानुसार, तिसऱया लाटेत गंभीर मृत्यूची टक्केवारी 5 टक्क्मयांच्या आत आणून एकूण मृत्यू 40 हजारांवर आणले जाऊ शकतात. तर दुसऱया लाटेमध्ये गंभीर स्वरुपाचे प्रमाण 20 टक्के होते. त्यामुळे आतापर्यंत 1.7 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतातही कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. दुसऱया लाटेत दररोज नवीन संसर्गाचे प्रमाण 4.14 लाखांवर पोहोचले आहे. केवळ मे महिन्यातच कोरोनाचे 90.3 लाख नवीन रुग्ण आढळले होते. आतापर्यंत एका महिन्यात कोणत्याही देशात कोरोनाचे इतके नवीन रुग्ण आढळले नाहीत, असेही अहवालात स्पष्ट केले आहे.