प्रतिनिधी /पर्वरी
गोवा विधानसभा 2022च्या निवडणुकीत पहिल्यांदाच तृतीयापंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून यावेळी सात तृतीयापंथी पहिल्यांदाच आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.यात उत्तर गोव्यातील दोन (पर्वरी आणि सांताप्रुज मतदारसंघ प्रत्येकी एक एक) तर दक्षिण गोव्यातील पाच जणांचा समावेश आहे.नुकताच दक्षिण गोव्यात मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल यांच्या उपस्थितीत तृतीय पंथीयांना निवडणूक कार्ड वितरण करण्याचा कार्यक्रमही करण्यात आला. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच गोवा विधानसभा निवडणुकीत ते मतदान करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुध्दा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे कारण मतदान हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. तृत्तीय पंथीय समाज हा नेहमीच देशातील, समाजातील सर्व नागरिकांच्या निरोगी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करत असतो. ती या समाजाची परंपराच आहे. निवडून येणाऱया सरकारनेदेखील देशात स्वस्थता, शांतता आणि समाधान प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा या तृतीयपंथीची असते. समाज अशा लोकाकडे विचित्र नजरेने पाहत असतो.त्यांना कुठलेच अधिकार नाहीत. त्यांच्याजवळ स्वतःचे ओळखपत्र ,रेशनकार्ड,आधार कार्ड अशा प्रकारचे महत्वाचे दस्तावेज नाहीत.ते देशात राहूनही त्यांना कुठलेच अधिकार मिळत नाहीत.यांची त्यांना खंत होती.पण आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सर्व अधिकार मिळत आहेत. त्यासाठी त्यांना अनेक बिगर सरकारी संस्था?नी मदतही केली आहे.