लॉकडाऊन काळात नियम मोडणारे वाहनधारक कारवाईच्या फेऱया
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱया वाहनधारकांना एकप्रकारे ताळय़ावर आणले आणि त्यांना चांगली शिस्त लागली. जिल्हय़ात सुमारे 95 टक्के दुचाकीस्वार आज दंड टाळण्यासाठी ‘हेल्मेट’ वापरू लागल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. पण गेल्या 2 महिन्यांत नियम मोडणाऱयांत हेल्मेट न वापरणाऱया तब्बल 13 हजार 154 दुचाकीस्वारांकडून विक्रमी 65 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात विनाकारण गाडय़ा घेऊन नियम मोडून फिरणाऱयांवर कडक कारवाई केली जात आहे. या वाहनचालकांना एक चांगली शिस्त लावली आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे जिह्यात हेल्मेट वापरणाऱया दुचाकीस्वारांची संख्या कमालीची वाढली आहे. जवळपास 95 दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे हेल्मेट सक्ती यशस्वी झाल्याचं चित्र आहे. तसेच नियम मोडणाऱया वाहनचालकांकडून विक्रमी दंडही वसूल करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरू नका, असं आवाहन लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासून पोलिसांकडून करण्यात येत होतं. मात्र तरी सुद्धा दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडताना दिसत होते. पण, नियमांवर बोट ठेवत ट्रफिक पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. आवाहन केल्यानंतर देखील वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नव्हते किंवा हेल्मेट घातले जात नव्हते. मात्र कोरोनाच्या या काळात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे वाहनचालकांना मात्र चांगली शिस्त लागली असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.
नियम मोडणाऱया वाहनचालकांकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल
हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न घालणे, किंवा विरूद्ध दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे नियम मोडणाऱया पोलिसांनी कारवाई केली. लॉकडाऊनच्या या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी 28 हजार 599 वाहन चालकांकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिह्यात शहर असेल किंवा इतर भागात असेल मोठय़ा प्रमाणावर वाहनचालक कारवाईच्या भीतीने नियमांचे पालन करत आहेत. आता तर हेल्मेट वापरणाऱयांची संख्याही वाढल्याचे जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.