प्रतिनिधी/ सातारा
मागील महिन्यापासुन अवकाळी पावसाला जिल्हय़ात सुरूवात झाली आहे. यातच बुधवारी ही सायंकाळच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सध्या कडक लॉकडाऊन असल्याने संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरच शांत झाल्याचा दिसत होता. केवळ पावसाच्या सरी व वादळी वाऱयाचाच आवाज येत होता.
पावसाचे प्रमाण इतके होते की कुपनलीका तुडुंब भरून वहात होत्या. तसेच या जोरदार पावसामुळे बहुसंख्य भागातील विद्युत पुरवठा ही खंडीत झाला होता. मुख्यतः कित्तेक मार्गावरील पथदिवे ही बंद झाले होते. त्यामुळे सर्वत्र आंधाराचे सांम्राज्य पसरले. गेल्या रविवारी ही विजांसह पाऊस येत असल्याने कित्तेकांच्या साहित्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बुधवारी पडत असलेल्या या पावसामुळे जागृक महिला वर्गांनी आधीच सर्व विद्युत उपकरणे बंद करून ठेवली होती. सातारा शहरात सायंकाळी 7 च्या सुमारास या पावसाला सुरूवात झाली.
जिल्हय़ातील सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात खरी कसरत झाली ती म्हणजे गस्ती साठी उभे असणाऱया पोलिस वर्गांची अचानक कोसळत असलेल्या या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कित्तेक पोलीस वर्ग हे या पावसातुन बचावासाठी सुरक्षित आसरा घेऊन थांबताना दिसत होते.
दोन ते तीन दिवस जातात न जातात पुन्हा या अवकाळी पावसाला सुरूवात होताना दिसत आहे. शेतकऱयांसाठी हा पाऊस मात्र फायदेशीर आहे. कारण उन्हामुळे तापलेल्या जमिनीला चांगलाच ओलावा या पावसामुळे मिळतो. त्यामुळे खरीप लागवडीसाठी अत्त्यंत पोषक वातावरण यामुळे तयार होते. त्यामुळे या अवकाळी पावसाबाबत कित्तेक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
त्यातच सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती या पावसाची घेतली होती. कारण कधी ऊन कधी पाऊस पडत असल्याने आरोग्याच्या कोणत्या तक्रारी जाणवतील की काय? या भितीने नागरिकांनी आयुर्वेदीक काढे, वाफारे घेण्याचे सुरू केले. मुख्यतः गरम पाणी पिण्याकडे अधिक कल देण्यात येत होता.