वृत्त संस्था/ नवी दिल्ली
देशाच्या राजधानीत गेल्या काही दिवसापासून प्रदूषण प्रचंड वाढले आहे. अशा स्थितीमध्ये सईद मुस्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात येथे क्रिकेटपटूंना झगडावे लागेल, हे निश्चित आहे.
दिपावलीनंतर दिल्लीतील हवामान आणखी बिघडले आहे, अशा स्थितीमध्ये दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम आणि पालमच्या हवाई दल मैदानावर या स्पर्धेतील सामने खेळविले गेले. आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यापयत्&ंत अली असून या टप्प्यातील सामने दिल्लीतील दोन स्टेडियम्समध्ये खेळविले जाणार आहेत. या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन उपांत्यपूर्व फेरीतील सामने होणार असून सकाळच्या सत्रात एक तर दुपारच्या सत्रात एक सामना होणार आहे.
या स्पर्धेत राजस्थान संघाची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली असून त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना विदर्भ संघाबरोबर गुरूवारी सकाळी 8.30 वाजता पालमच्या हवाईदलाच्या स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि केरळ यांच्यातील उपांत्यपूर्व सामना अरूण जेटली स्टेडियममध्ये गुरूवारी सकाळी 8.30 वाजता सुरू होईल. बंगाल-कर्नाटक यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुरूवारी दुपारी 1 वाजता अरूण जेटली स्टेडियमवर त्याचप्रमाणे गुजराथ आणि हैदराबाद यांच्यातील सामना दुपारी 1 वाजता पालमच्या हवाईदलाच्या मैदानावर खेळविला जाणार आहे.