ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एनसीबीआरने भारतातील सन 2019 ची शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. 2019 मध्ये देशात 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामधील 3 हजार 981 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 89 लाख शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली होती. या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचे या आकडेवारीवरून दिसते.
एनसीआरबीने सन 2017 आणि 2018 ची शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली नसली तरीही 2014, 2015, 2016 आणि 2019 मध्ये 3500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचे समोर आले आहे.