ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शुक्रवारी 2 लाख 34 हजार 692 नव्या बाधितांची उच्चांकी नोंद झाली. या रुग्णवाढीपैकी 69.05 टक्के म्हणजेच 1.61 लाख रुग्ण केवळ 7 राज्यांमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्रात 63,729, उत्तरप्रदेशात 27,360, दिल्लीत 19,486, कर्नाटकात 14,859, छत्तीसगडमध्ये 14,912, मध्य प्रदेशात 11,045 आणि केरळमध्ये 10,031 लोक बाधित झाले असून, या राज्यांमध्येच सर्वात जास्त 70.17 टक्के म्हणजेच 939 मृत्यू झाले आहेत.
देशात आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 जण कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, आज सायंकाळपर्यंत दीड कोटींचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शुक्रवारी 1 लाख 23 हजार 354 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 16 लाख 79 हजार 740 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 1341 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 1 लाख 75 हजार 649 रुग्ण दगावले आहेत. देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.