इटालियन नागरिकाचा राजस्थानमध्ये मृत्यू : रुग्णांचा आकडा 223 वर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या 69 वषीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता. हृदय बंद पडल्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये या नागरिकाचा मृत्यू झाला.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनसार सदर रुग्णावर यशस्वी उपचार सुरू होते. कोरोनातून मुक्तता होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होती. मात्र, आजारपणातच त्याचा मृत्यू झाल्यामुळे भारतातील पाचव्या बळीची शुक्रवारी नोंद झाली. आतापर्यंत भारतात कोरोनाची लागण झाल्याची 204 प्रकरणे आली असून चार मृत्यूंची नोंद झाली आहे. हे चार मृत्यू दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये झाले आहेत.
देशातील रुग्णसंख्या 223 वर
भारत सरकार अतोनात प्रयत्न करत असूनही देशातील रूग्णांची संख्या वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून अनेक उपाययोजनाही लागू करण्यात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 223 वर पोहोचली होती. यामध्य 32 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदली गेली आहे.