ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात दररोज 55 हजारांहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशात 5 लाखांहून अधिक जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी 6 क्षेत्रातील 6 देशांनी माहितीचे सादरीकरण केले. दक्षिण पूर्व आशियामार्फत डॉ. हर्षवर्धन यांनी भारतातील माहितीचे सादरीकरण केले.
त्यावेळी इतर देशांच्या आकडेवारीवरून जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर 3 टक्के आहे तर कोरोना संसर्ग दुप्पट होण्याचा दरही 8.78 टक्क्यांच्या जवळपास आहे.