ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून, मागील 24 तासात 4187 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. एका दिवसातील मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने 2 लाख 38 हजार 270 रुग्ण दगावले आहेत.
शुक्रवारी देशात 4 लाख 01हजार 178 बाधितांची नोंद झाली. तर 3 लाख 18 हजार 609 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 37 लाख 23 हजार 446 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत देशातील 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.