ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात नव्या कोरोना रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे बाधित आढळून आले. 40 हजार 863 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशातील पॉझिटिव्हिटी रेट 10.21 टक्के आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 90 हजार 611 आहे. आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 4 लाख 83 हजार 790 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात मागील 24 तासात 41 हजार 434, त्यानंतर दिल्लीत 20 हजार तर पश्चिम बंगालमध्ये 18 हजार रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, भारतातील 27 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3623 एवढी आहे. त्यापैकी 1409 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.