प्रतिनिधी/ चिपळूण, रत्नागिरी
महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण होणे बंधनकारक असल्याचा परिणाम महाविद्यालये सुरू होण्यावर झाला आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी चिपळूणसह रत्नागिरीत विद्यार्थ्यांचा प्रतिसादच मिळाला नाही. दोन डोसच्या अटीमुळे दिवाळीनंतरच खऱया अर्थाने महाविद्यालये गजबजण्याची शक्यता आहे.
गेल्या पावणेदोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक अटी व नियम घालत शासनाने शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार बहुतांश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. एक दिवसाआड विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळत असल्याचा त्यांना फायदा होत आहे. बुधवारपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण असण्याची मुख्य अट आहे. मात्र विद्यार्थ्यांना डोस मिळाले नसल्याने बुधवारी पहिल्या दिवशी तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आलेच नाहीत.
कामकाज सुरु करण्यासाठी महाविद्यालयांनी आपली तयारी ठेवली आहे. सध्या सुरु असलेल्या व्दितीय वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा 30 ऑक्टोबरला संपणार आहेत. त्यामुळे या वर्षातील विद्यार्थी परीक्षा संपेपर्यंत महाविद्यालयात येणार नाहीत. त्यातच 1 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी असल्याने दिवाळीनंतरच वरिष्ठ महाविद्यालये खऱयाअर्थाने सुरू होण्याची शक्यता आहे.
किर-घैसास-देव महाविद्यालयात 50 टक्के विद्यार्थीं
बुधवारपासून वरीष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. रत्नागिरी शहरातील किर-घैसास-देव महाविद्यालयामध्ये 50 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होत़ी शासन निर्देशाप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली होत़ी सध्या व्दितीय वर्षाच्या परीक्षा चालू असल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आल़ी
दुसऱया डोससाठी उद्या लसीकरण
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात केवळ 70 विद्यार्थ्यांची उपस्थिती होत़ी ऑनलाईन मिटींग घेवून 2 डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच येण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले होत़े दुसरा डोस न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी लसीकरण होणार आह़े यासाठी 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती प्ऱ प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी दिल़ी