रप्राणिक हीलिंग ही एक पूरक उपचारपद्धती आहे जी शारीरिक, मानसिक, आर्थिक व नातेसंबंधातील सर्व समस्यांवर तुमच्या भौतिक शरीराला हात न लावता कोणतेही औषध न देता प्रभावीपणे काम करते. ग्रँड मास्टर चोआ कोक सुई यांनी त्यांच्या सखोल अभ्यासातून या उपचारपद्धतीचा अभ्यासक्रम तयार केला व त्यात त्यांनी उपचाराबरोबरच ‘द्विहृदय ध्यानसाधना’ ही शिकवली. आज ही साधना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा विविध स्तरावरील वैयक्तिक उन्नतीबरोबरच आध्यात्मिक उन्नतीसाठी ही ‘द्विहृदय ध्यानसाधना’ अत्यंत उपयुक्त ठरते. अर्थात त्या सर्वांचे साधन जे म्हणजे शरीर, ते त्याच्या ऊर्जास्तरांमुळे सर्वच प्रकारचे स्वास्थ्य उत्तम साधते. मागील काही लेखांमध्ये आपण पाहिले की आपले शरीर हवा, जमीन व सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सतत ग्रहण करत असते व आपले आरोग्य राखत असते. या तीन प्रकारच्या ऊर्जेव्यतिरिक्त आपल्याला ज्या एका विशिष्ट ऊर्जेची गरज असते ती म्हणजे ‘आध्यात्मिक ऊर्जा’. ही ऊर्जा आपले जीवन सर्वच स्तरांवर संतुलित करते. आपल्या शरीरात आध्यात्मिक ऊर्जेचा स्तर जितका अधिक तितके आपले जीवन सुरळीत व संपन्न असते. आपल्या ऊर्जाशरीरावर असलेले ‘सहस्रार चक्र’ म्हणजेच ‘क्राऊन चक्र’ हे या आध्यात्मिक ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे. सहस्रार चक्रातून ही ऊर्जा आपल्या शरीरात येते व संपूर्ण शरीरात वितरित होते. आपल्या शरीरात येणाऱया आध्यात्मिक ऊर्जेचे प्रमाण हे आपल्या सहस्रार चक्राच्या सक्रीयतेवर अवलंबून आहे. सहस्रार चक्र जितके अधिक सक्रिय असेल तितकाच आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाहसुद्धा अधिक असतो.
शरीर आजारी पडते तेव्हा व्याधिग्रस्थ ऊर्जा आपल्या ऊर्जावहिनी नाडय़ा व चक्रांमध्ये साठून राहते असे मागील लेखात म्हटले आहे. द्विहृदय साधनेत आपण अनाहत व सहस्रार चक्र क्रमाक्रमाने सक्रिय व उत्तेजित करतो परिणामी अत्यंत मोठय़ा प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. ही ऊर्जा संपूर्ण शरीरभर प्रवाहित होताना आपल्या ऊर्जावाहिनी नाडय़ा व चपे स्वच्छ करत जाते. आध्यात्मिक ऊर्जेची जोड मिळाल्याने दूषित ऊर्जा शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया अनेक पटींनी वाढते. परिणामी शरीराची स्वयंव्याधी निवारणाची क्षमताही अनेक पटींनी वाढते. शरीरातील अन्य चपेही उत्तेजित व सक्रिय झाल्याने आपले शरीर सुदृढ व निरोगी तर होतेच शिवाय अनेक असाध्य आजारांचे निवारणही वेगाने होऊ लागते.
शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, अनेक शारीरिक आजार हे मानसिक व भावनिक असंतुलनामुळे होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात भावनिक व मानसिक संतुलन साधणे ही अशक्मयप्राय गोष्ट होऊन बसली आहे. आजची आपली जीवनशैली, आपली करमणूक साधने, आसपास घडणाऱया घटना या आपले ताणतणाव, नैराश्य, भीती, न्यूनगंड यांना खतपाणी घालणाऱया आहेत. परिणामी लोकांची मानसिक स्थिती खालावत चालली आहे. ‘द्विहृदय ध्यानसाधना’ हा या समस्येवर महत्त्वपूर्ण उपाय आहे.
आपल्या ऊर्जाशरीरावर असलेली विशिष्ट चपे ही विशिष्ट प्रकारच्या भावनांची केंद्रस्थाने आहेत. छातीच्या मध्यभागी असलेले अनाहत (हार्ट) चक्र हे आपुलकी, प्रेम, दया, आनंद, जिव्हाळा, क्षमा, करुणा अशा उच्चस्तरीय भावनांचे केंद्र आहे.डोक्मयावर असलेले सहस्रार(क्राऊन)चक्र हे वैश्विक प्रेमाचे केंद्रस्थान आहे परंतु, वैश्विक प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी प्रथम आपल्यातील उच्चस्तरीय भावना वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. ‘द्विहृदय ध्यानसाधनेत’ प्रथम अनाहत चक्र सक्रिय करून संपूर्ण पृथ्वीला प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती यांचे आशीर्वाद दिले जातात. त्यानंतर सहस्रार चक्र सक्रिय करून संपूर्ण पृथ्वीला प्रेमाचा आशीर्वाद दिल्याने आपल्यातील प्रेम, करुणा यासारख्या उच्चस्तरीय भावना वाढीस लागतात. तसेच या साधनेद्वारे मिळणाऱया दैवी ऊर्जेमुळे आपल्यातील राग, द्वेष यासारख्या निम्नस्तरीय भावनांचे रूपांतर वैश्विक प्रेम व करुणा यामध्ये होऊ लागते.
द्विहृदय ध्यानसाधनेत जेव्हा आपण पृथ्वीला शुभाशीर्वाद देतो तेव्हा आपल्यालाही अनेक पटींनी शुभाषिश आणि दैवी ऊर्जा मिळते परिणामी आपल्यावर होणारा ताणतणाव व नैराश्याचा प्रभाव कमी होत जातो व भावनिक-मानसिक संतुलन साधणे सहज शक्मय होते. शारीरिक मानसिक स्वास्थ्याबरोबरच आजच्या काळात समृद्ध व समाधानी जीवन जगण्यासाठी आर्थिक स्थैर्य ही देखील महत्त्वाची बाब आहे. निसर्गाचा एक साधा नियम आहे, जे तुम्ही द्याल ते अनेक पटींनी वाढून तुम्हाला मिळेल. हाच साधा नियम आपण आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी द्विहृदय ध्यानसाधनेत वापरतो.
आपल्याला दिसून येते की एकाच प्रकाराचे शिक्षण घेतलेल्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती खूप यशस्वी होते तर दुसरी व्यक्ती खडतर जीवन जगत राहते. समान शिक्षण व क्षमता असूनही दोघांची आर्थिक स्थिती ही वेगवेगळी असते. प्राणिक हीलिंगमध्ये झालेल्या संशोधनात या समस्येचे कारण हे त्या व्यक्तीच्या ऊर्जादेहात असल्याचे निश्चित झाले आहे. आपल्या ऊर्जादेहातील काही चपे काही विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचे नियंत्रण करतात. आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी काही विशिष्ट चपे सक्रिय असणे आवश्यक आहे. या साधनेत आपण संपूर्ण पृथ्वीला आर्थिक संपन्नतेचा आशीर्वाद दिल्याने पेराल ते अनेक पटींनी उगवेल या न्यायाने आपणही आर्थिक संपन्नता मिळवण्यास पात्र होतो. तसेच जेव्हा आपण ध्यानसाधना करतो तेव्हा प्रचंड प्रमाणात येणाऱया दैवी ऊर्जेमुळे आपल्यातील भावना, न्यूनगंड हे बाहेर टाकले जातात. आपले शरीर हे दैवी चैतन्याने भरून निघते. परिणामी आपली कार्यक्षमता वाढते आणि आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवणे अधिक सुकर होते.
अनाहत चक्र आपल्या हृदयाजवळ असलेल्या थायमस ग्रंथीचे उर्जन व नियंत्रण करते. अनाहत चक्र सक्रिय झाल्यामुळे थायमस ग्रंथीही सक्रिय होते परिणामी Endomarphins नामक संप्रेरके या ग्रंथीतून स्रवली जातात. या संप्रेरकांमुळे जी रासायनिक प्रक्रिया शरीरात होते त्यामुळे आपल्याला आनंदाची जाणीव होते व ती बराच वेळ टिकून राहते. त्याचबरोबर थायमस ग्रंथी ही आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे द्विहृदय साधनेने कालांतराने आपली रोग प्रतिकारक क्षमतादेखील अनेक पटींनी वाढते. या कोरोनाच्या काळात बऱयाच लोकांना द्विहृदय ध्यानसाधनेने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याबरोबरच नैराश्य, भीती अशा नकारात्मक भावना दूर घालवण्यासाठी बरीच मदत झाल्याचा अनुभव आहे.
विज्ञानाने आज सिद्ध केले आहे की, एक सामान्य माणूस एका दिवसात सुमारे 60,000 विचार व भावना निर्माण करतो. त्यातील अनेक विचार व भावना नकारात्मक असतात. अनेक विचारांचा आपल्या ध्येयाशी काही संबंध नसतो. हे सगळे विचार व भावना आपल्या ऊर्जादेहात, चक्रांमध्ये व ऊर्जावहिनी नाडय़ांमध्ये साठून राहतात. परिणामी जेव्हा आपण द्विहृदय ध्यानसाधना करायला बसतो किंवा अभ्यास व कामांवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो किंवा एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्ष केंद्रित करताना अनेक अडथळे येतात. याचे कारण असे की या नकारात्मक विचार व भावनांचे आपल्या ऊर्जाशरीरात एक जाळे तयार झालेले असते त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन एखाद्या समस्येच्या मुळाशी जायची आपली क्षमता, एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देण्याची आपली पद्धत या सगळय़ावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला बघायला मिळते की, अनेक गुन्हे, अनेक वाईट घटना, अनेक चुकीचे निर्णय हे या नकारात्मक भावना व विचारांच्या प्रभावाखाली येऊन घेतले जातात. जेव्हा आपण द्विहृदय ध्यानसाधना करतो तेव्हा आध्यात्मिक ऊर्जेच्या प्रचंड प्रभावामुळे हे सर्व नकारात्मक विचार व भावना शरीराबाहेर फेकल्या जातात. परिणामी, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंदित करणे, एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन सारासार विचार करणे शक्मय होते. आपल्यातील दडपलेल्या भावनांचा (Suppressed emotions) स्फोट होऊन चुकीचे निर्णय घेण्याची संभावना कमी होते. मन शांत राहिल्याने कामाचा, अभ्यासाचा ताण सहन करणे सहज शक्मय होते या सर्वांमुळे आपली कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते व यशाकडे आपली वाटचाल सहजपणे शक्मय होते.
आज्ञा अभिषेक कोयंडे