प्रतिनिधी/ बेळगाव
कुटुंबासमवेत प्रत्येक जण सण साजरा करतो. परंतु ज्यांना कुटुंबच नाही किंवा ज्यांना घरच्यांनी अव्हेरले आहे अशा मुलांसमवेत जायंट्स सखीने दिवाळी साजरी केली. या संस्थेने अनाथांचे संगोपन करणाऱया नंदन मक्कळधाम या ठिकाणी जाऊन दिवाळीचा आनंद मुलांना दिला.
जायंट्स सखी ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविते. यंदा रेलनगर येथील नंदन मक्कळधाम येथे जाऊन येथील मुलांना तेल, साबण, सुगंधी उटणे तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. जायंट्स सखी तीन वर्षांपासून दिवाळीला विविध वस्तूंचे संकलन करते. यामध्ये कपडे, फराळ, विद्यार्थ्यांसाठी शालेय व दैनंदिन वापराच्या वस्तू याचे संकलन करून ते मुलांना देण्यात येते.
फराळ आणि दिवाळीचे सर्व साहित्य मिळाल्याने मुलेही आनंदी झाली. त्यांनी सुद्धा जायंट्स सखीच्या सदस्यांसमवेत रांगोळय़ा काढून आकाश दिवे लावून दिवाळी साजरी केली.
याप्रसंगी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, सचिव शीतल पाटील, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, अर्चना पाटील, शीतल नेसरीकर, भाग्यश्री पवार, ज्योती पवार, सुलोचना कुट्रे उपस्थित होत्या. आश्रमातर्फे कस्तुरी बॅगेरी यांनी सर्वांचे आभार मानले.