रिकाम्या पिशव्यांमुळे प्रदूषणात होतेय वाढ : वन विभागाने लक्ष घालण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
वनविभागासह नर्सरीतील प्रदूषण टाळण्यासाठी वन विभागाने राज्यातील सर्व नर्सरी प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने हा निर्णय हवेतच विरला आहे. दरम्यान नर्सरीतील 6 कोटी रोपे प्लास्टिकमुक्त होणार असा दावा देखील त्यावेळी करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात निर्णयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्रीय पर्यावरण खात्याच्या निर्णयानुसार नर्सरीतील रोपे प्लास्टिकमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील वन विभागानेही संपूर्ण नर्सरी प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने नर्सरीतील रोपे प्लास्टिकमध्येच तयार होताना दिसत आहेत. दरवषी नर्सरीतून लाखो रोपे तयार केली जातात. रोपांच्या संवर्धनासाठी प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मात्र प्रदूषण टाळण्यासाठी तागाच्या पिशव्या आणि केळीच्या पानांच्या पिशव्यांचा वापर करावा, असा आदेश देण्यात आला होता. मात्र अद्यापही नर्सरीतून रोप लागवडीसाठी प्लास्टिकचाच वापर होताना दिसत आहे.
बेळगाव वनविभागात मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर यासह खानापुर तालुक्मयातील ओत्तोळी, सावरगाळी, कणकुंबी, लेंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी ठिकाणी नर्सरी आहेत. या नर्सरीतून दरवषी लाखो रोपे तयार होतात. या रोपांसाठी प्लास्टिकचाच वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या नर्सरी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. राज्यात दरवषी 6 कोटीहून अधिक वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी 3.5 कोटी रोपे ही नागरिक आणि स्थानिक संस्थांना वितरीत केली जातात व उर्वरित रोपे वनविभाग विविध ठिकाणी लागवड करते. या रोपांसाठीदेखील प्लास्टिकचाच वापर केला जातो. त्यामुळे लागवड केलेल्या ठिकाणी या रिकामी पिशव्यांचे प्रदूषण वाढत आहे. दरम्यान वन क्षेत्रातदेखील रिकाम्या पिशव्यांमुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वन विभागाने नर्सरी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.