प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या नाचणे शांतीनगर रसाळवाडी येथे घराला लागलेल्या आगीमध्ये सुमारे 2 लाख 65 हजार रूपयांचे नुकसान झाले आह़े याप्रकरणी शर्मिला महेश यादव (42) यांनी शहर पोलिसांत खबर दिल़ी या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेबुवारी रोजी दुपारी 12 च्या सुमारास यादव यांच्या घराला आग लागल़ी शेजाऱयांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल़ा मात्र आग वाढत गेल्याने आगीचे मोठे लोळ हवेमध्ये उठू लागल़े दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल़े सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल़े आगीमध्ये घरामधील सामान जळून खाक झाले आहे. एकूण 2 लाख 25 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे यादव यांनी सांगितले आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े