औरंगाबाद\ ऑनलाईन टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आपेक्षा आहे. आपला पक्ष मोठा करावा असे प्रत्येकाला वाटतं आणि तसं करण्यात काही गैर नसल्याचे म्हणत अमित देशमुख यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दिला आहे. ते आज औरंगाबादेत बोलत होते.
स्वबळाच्या नाऱ्याचा गैरअर्थ काढणं चुकीचं आहे. आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याबाबतही निश्चितपणे विचार केला जाईल, असे अमित देशमुख यावेळी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत भूमिका स्पष्ट ठेवली आहे. नाना पटोले यांनी यापुर्वीच म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाच काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
Previous Articleआरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्याप सुरूच
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment