ग्रामपंचायत निवडणूक अजूनही अधंश्र्धेवरच, राजकारणात बदल होणार कधी ?
व्हनाळी / सागर लोहार
ग्रामपंचायत निवडणूकीची रंगत आता वाढली असून 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्शवभुमिवर मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या कुलपत्या लढवल्या जात आहे. भंडाऱ्यावर हात मारून शपत्ता घेणे, जागृत देवस्थानानां जावुन देवाच्या पुढ्यातच वचन घेणे आणि घरोघरी चिकन-मटन पोहचविण्याबरोबरच जेवनावळी घालताना सुध्दा देवालाच बकऱ्यांचे बळी देणे असे सर्रास प्रकार ग्रामपंचायत निवडणूकीच्या एैन टप्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे सहाजिकच या निवडणूकीच्या निमित्ताने देवांचे महत्व वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पक्ष, गट, तट यापेक्षा स्थानिक आघाड्या पै-पाहुणे, भऊबंदकी, आणि मैत्रीपुर्व संबध याला विशेष महत्व राहते. त्यामुळे सहाजिकच निवडणूकीच्या सणात हे सर्व संबध आणि पै पाहुणे यांच्यातील नाते दृढ करण्याचे याच निवडणूकीच्या खर्चातुन मनस्वे रचले जातत. ग्रामपंचायत निवडणूक हि अशा गोष्ठींसाठी पर्वनिच ठरते. अशा गोष्ठींमुळे सद्यातरी निवडणूकीच्या रात्री जागताना दिसत आहेत. यामुळेच प्रचारात मोठी रंगत आल्याचे या निवडणूकीत दिसत आहे.
कागल तालुक्यात प्रमुख चार गट आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार. संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची राज्यातील महाआघाडीच्या माध्यमातून तालुक्यात युती असली तरी गावागावात गटनेत्याना सोयीच्या अशा युत्या झाल्या आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी हसन मुश्रीफ, संजय घाटगे,संजय मंडलिक गट महायुती पॅटर्न आहे तर कांही ठिकाणी समरजितसिंह घाटगे गट व संजय घाटगे गट विरूध मंडलिक, मुश्रीफ गट अशी युती आहे. पण या सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावपातळीवर नातेसंबध जोपासत केलेल्या युत्याच महत्वपुर्ण ठरतात.
लोकसभा, विभानसभा, जिल्हा पंचायत समिती या निवडणूकीतील मतांची गोळाबेरीज याचा संदर्भ वेगळा असुन शिवाय ग्रामपंचायत म्हणजे मिनी आमदारकीच म्हणून ओळख असल्याने येथील मतदारांचा वेगळाच निकाल सर्व पक्षाच्या नेते मंडळिंना पहायला मिळतो. ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये धार्मिक गोष्ठींना मोठे प्राधान्य देवून देवाला नवस, कैाल लावणे, गाराणे घालणे, आंगारा, भंडारा, परडी शपता घेणे अशा विविध अंधश्रधांचा कळस व देवदैवतांच्यावर असलेली दुढ श्रद्धा यातून पहायला मिळते तर अनेक ठिकाणी गट तट बाजुला ठेवून ग्रामदैवतांच्या मंदिर उभारणीसाठी ग्रांपंचायत निवडणूक बिनविरोध करून निवडणूकीतील अनावश्यक खर्चाचा सदुपयोग अशा विधायक कामासांठी केल्याचा आदर्श ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केलेल्या गावांनी दाखवून दिला असल्याचे पहायला मिळाले आहे.
ग्रामपंचायत म्हणजे आमदारकीच….
लोकसभा, विधानसाभा निवडणूकीत नेता किंवा पक्षनिष्ठा पाहूनच मतदान केले जाते. पण गावच्या स्थानिक ग्रामपंचायत निवडणूकीत पक्ष नेत्या पेक्षा पै पाहुणे, भाऊबंदकी यांचे नातेसंबध जोपासण्यासाठी व स्थानिक स्थरावरील ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडेच राहण्यासाठी व्यक्ती पाहुनच मतदान केले जाते. त्यामुळे गावची ग्रांमपंचायत हि सर्वाच्या दुष्टीने मिनी आमदारकीच म्हणून निवडणूका ताकतीने लढवल्या जातात.
आर्थिक भार गटनेत्यावरच…
सरपंच पदाचे आरक्षण आद्याप जाहिर न झाल्याने प्रभागामध्ये ठराविक प्रवर्गाचे उमेदवार शोधताना अनेक गटनेत्यांना दमछाक करावी लागली. काष्ठचे उपलब्ध असलेल्या उमेदवारींची आर्थिक कुवत नसल्याने त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापासूनचा कागदपत्रे, विविध कर याचा आर्थिक खर्च गट नेत्यांनाच कारवा लागल्याने उमेदवार सामान्य कार्यकर्त्याचा आर्थिक भार स्थानिक गटनेत्यांवरच पडत असल्याचे चित्र दिसत आहे.