भवानीनगर तसेच इतर परिसरातील गरिबांना जीवनावश्यक किटचे वाटप
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी पहायला मिळते. ही गंभीर परिस्थिती पाहून निवृत्त कॅप्टन मारुती काकतकर यांनी 80 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.
गेल्या महिन्याभरापासून सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. काही जणांना आपल्याकडे पैसे असूनही जीवनावश्यक वस्तू मिळणे अशक्मय झाले. कोरोनामुळे संपूर्ण देशच संकटात आला आहे. त्यामुळे मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. हे मानून निवृत्त कॅप्टन काकतकर यांनी गहू, तांदूळ, साखर, चहापूड, पोहे, तूरडाळ, यासह इतर साहित्य वितरित करण्यात आले आहे.
यावेळी भवानीनगर परिसरातील राजेश जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. हे साहित्य वाटप करताना निवृत्त कॅप्टन काकतकर यांनी जनतेला घरीच राहून या संकटावर मात करा, असे आवाहन केले आहे. विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नका, कारण हा आजार भयानक आहे. या आजाराला आपण पराभूत करायचे असेल तर त्यासाठी स्वत:च सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले.