नेवरी ग्रामस्थांनच्या वतीने नागरी सत्कार संपन्न
कडेगांव : प्रतिनिधी
पिढ्यान् पिढ्यांचा प्राणी प्रश्न नेवरी वितरीकेमुळे कायमचा सुटला असे प्रतिपादन संग्राम देशमुख यांनी केले. ते नेवरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या महानागरी सत्कारप्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, कडेगावच्या सभापती मंगलताई शिरसागर, उपसभापती आशिष घार्गे, ज्येष्ठ नेते दत्तूशेठ सूर्यवंशी, रेश्माताई साळुंखे, प्रकाश गडळे, शिवादाजी महाडिक, वसंत महाडिक प्रमुख उपस्थित होते.
नेवरी वीतरीके मुळे आज नेवरीचा पाणी प्रश्न कायमचा निकालात निघाला या वितरक योजनेमुळे या परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट होणार आहे. नेवरी, आंबेगाव, शेळकबाव, भगतमळा, वडियेरायबाग या व्यतिरिक्त सात ते आठ गावांना परक्यूलेशनमुळे जास्तीचा फायदा होऊन आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली येणार आहे. उमरकांचन पुनर्वसित गावठाणात या गावातला ही पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान बिरोबा मंदिर येथे सर्व ग्रामस्थांनी मागणी केली व त्या देवाच्या साक्षीने त्याच बैठकीत मी वचन दिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्ष दालना मध्ये गुणाले, झेंगटे, कडुसकर साहेब व ग्रामस्थ यांची बैठक लावली व योजना बंदिस्त पाईप्स कशी करायची यावर चर्चा झाली. त्यानंतर लगेचच वारणाली, सांगली येथे सर्व अधिकाऱ्यांसोबत आंबेगाव, शेळकबाव, भगत मळा, वडेरायबाग येथील ग्रामस्थांसह मोठी एकत्रित बैठक झाली. या मध्ये किती क्षेत्र भिजले पाहिजे त्यात सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत बैठक झाली व त्यांनी अधिकाऱ्यांना इस्टिमेट मंजुरीसाठी आदेश दिले. केंद्रातील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी साहेब यांना विकासपुरुष म्हणून देशात ओळखले जातात. त्यांनी त्यावेळी बळीराजा योजना व मधून 40 कोटी निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. नेवरी परीसरातील शेतकरी गेली वीस वर्षे पाण्यापासून वंचित आहेत मात्र हे पाणी पुजन करताना पाणी ज्यावेळी पहिल्यांदा शिवराम मध्ये जात होते ते पाणी पाहून ग्रामस्थांच्या काय माझ्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले. पाणी केवळ आण्णांच्यामुळे मिळाले हे खरे सत्य अजून काहींना पचनी पडत नाही. येत्या सहा महिन्यांत याच नेवरी परीसरातील शिवारांनी हिरवा नेसलेला दिसेल.