पणजी / प्रतिनिधी
काँग्रेस पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षात गेलेल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच न्यायालयात सादर केलेली याचिका अजूनही अंतिम सुनावणीसाठी लागत नसल्याने याचिकादार गिरीश चोडणकर यांनी न्यायालयातील कर्माचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार केली आहे. सदर याचिका आतापर्यंत 18 वेळा सुनावणीसाठी आली. ऑगस्टमध्ये झालेल्या सुनावणीवेळी याचिका अंतिम सुनावणीसाठी घेण्याचे ठरले होते. तसे आदेशही न्यायमूर्तींनी दिले होते पण आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी याचिका सुनावणीस येत नसल्याने न्यायालयातील सूची तयार करणाऱया विभागाविरूद्ध तक्रार केल्याचे चोडणकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.