गोव्यातच परवानगी नसल्याने नाराजी : 30 हजार ज्येष्ठ नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
गेले 25 दिवस बंद असलेल्या राज्यातील पतपुरवठा संस्थांमुळे राज्यातील सुमारे 5 लाख खातेदारांना फटका बसला असून सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकात सहकार क्षेत्रातील क्रेडीट सोसायटय़ांना व्यवसाय चालविण्यासाठी पूर्ण परवानगी मिळाली आहे. केवळ गोव्यातच परवानगी नसल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
सर्वसामान्यांचे हाल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर तसेच सहकार प्रबंधक गावणेकर यांच्यासमोर सहकार क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींनी आपल्या कैफियती मांडल्यानंतर सहकार प्रबंधकांनी गोव्यातील सहकार क्षेत्रात क्रेडीट सोसायटय़ा किती महत्वाची कामगिरी बजावित आहेत याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो केंद्रीय गृहमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठविला, मात्र केंद्राने सदर प्रस्ताव फेटाळल्याने गोव्यात अद्याप पेडीट सोसायटय़ा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य व छोटय़ा ग्राहकांचे अक्षरशः हाल झालेले आहेत. नागरिकांच्या या हक्कावर पूर्णतः गदा आणण्यात आलेली आहे.
राज्यात सध्या 200 हून अधिक क्रेडीट सोसायटय़ा आहेत. त्यांच्या प्रत्येकी चार प्रमाणे सुमारे 800 शाखा आहेत. शिवाय पगारदार, क्रेडीट सोसायटय़ांच्या सुमारे 300 शाखा आहेत. शिवाय बहुराज्यांचा दर्जा प्राप्त झालेल्या सोसायटय़ांच्या सुमारे 200 शाखा आहेत. या सर्वांची कार्यालये बंद असल्याने ग्राहकांचे अक्षरशः हाल झालेले आहेत. विविध पतसंस्थांमध्ये 500 कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी आहेत. सुमारे 5 लाख खातेदार आहेत. अनेकजणांनी ठेवी ठेवलेल्या आहेत व त्यावरील व्याजावर आपली गुजराण करीत असतात. गेले 20 ते 22 दिवस सोसायटय़ा बंद असल्याने ग्राहकांना पैसे मिळालेले नाहीत. सोसायटीत पैसे ठेवलेले असून ते काढता येत नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे हाल
या साऱया पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे 25 हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची त्रेधा उडालेली आहे. विशेषतः खासगी क्षेत्रात काम करून काबाडकष्टाने जी थोडीफार पुंजी जमविली व निवृत्त झाल्यानंतर या ठेवी क्रेडीट सोसायटीमध्ये ठेवल्या त्यातून जे महिन्याकाठी व्याज मिळते त्यावर गुजराण या नागरिकांची होत असते, परंतु गेल्या 20, 25 दिवसांत या व्यक्तींना पेडीट सोसायटीची दारेच बंद झालेली आहेत. हे ज्येष्ठ नागरिक काही व्यावसायकांनाही फोन करतात. प्रत्यक्षात कोणी फोन घेत नाहीत त्यामुळे त्यांची धांदल उडालेली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची यामुळे परवड होतेच. छोटे छोटे उद्योग धंद्यावर आपली गुजराण करणाऱयांना क्रेडीट सोसायटय़ा हा एक आजार आहे, मात्र सध्या या सोसायटय़ा बंद केल्याने सर्वांचीच धांदल उडालेली आहे. अनेक मजुरांसाठी वरदान ठरलेल्या क्रेडीट सोसायटय़ांचे व्यवहार बंद करून टाकल्याने मजूरवर्गाला मदत कोण करणार ? राज्यातील क्रेडीट सोसायटय़ांमध्ये 5000 कोटींच्या ठेवी. दररोज शेकडो कोटींचे व्यवहार चालतात. खरे तर काही अटी आणि मार्गदर्शक तत्वे घालून पेडीट सोसायटय़ा तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकात शाखा सुरू
अनेक राज्यांमध्ये पेडीट सोसायटय़ांचे व्यवहार चालू आहेत. महाराष्ट्रात अनेक क्रेडीट सोसायटय़ांमध्ये शेतकऱयांची खाती आहेत. कर्नाटकांमध्ये देखील अशीच स्थिती आहे व तिथे त्यांना शहरातील शाखा देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. केवळ गोव्यातच परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी याकामी पुढाकार घेणे आवश्यक आहे.