शिवसेना, भाजपमध्ये श्रेयवाद शिवसेनेमुळेच शक्य – साई काणेकर
भाजपच्या इशाऱयानेच कार्यवाही-सरपंच खान
प्रतिनिधी / बांदा:
महाराष्ट्र-गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा पोलिसांची लाठी शुक्रवारी काढण्यात आली. ही लाठी आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे काढण्यात आल्याचे शिवसेना शहरप्रमुख साई काणेकर यांनी सांगितले. तर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने शनिवारी सीमेवर जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर तात्काळ लाठी काढण्यात आल्याचा दावा सरपंच अक्रम खान यांनी केला आहे. तर लाठी सुरू झाल्यामुळे सीमाभागातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी बांदा येथे पूर नुकसान आढावा बैठकीत बांद्यातील
व्यापाऱयांनी आमदार केसरकर यांच्याकडे पत्रादेवी येथील पोलीस लाठी काढण्याची मागणी केली होती. त्यावेळी केसरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून तात्काळ लाठी काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच लाठी काढण्यात आल्याचे साई काणेकर यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी पत्रादेवी येथे जात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी शहरप्रमुख साई काणेकर, उपतालुकाप्रमुख भैया गोवेकर, भाऊ वाळके, ओंकार नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, ग्रा. पं. सदस्य राजेश विरनोडकर, सुनील नाटेकर, गिरीश नाटेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गाळेल येथे दरडीखाली गाडला गेलेला युवक हा प्रशासनाचा बळी असल्याचा आरोप करत भाजपने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत तात्काळ तोडगा न काढल्यास जनांदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. तसेच निर्णय न झाल्यास शनिवारी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी तात्काळ पत्रादेवी येथील लाठी बंद करण्याचे आदेश दिल्याने व आंदोलन न करण्याची विनंती केल्याने भाजपने आंदोलन स्थगित केल्याची माहिती सरपंच खान यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना निवेदन दिले.
लाठी बंद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचे खान यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, बाळा आकेरकर, सर्वेश मुळये, मधु देसाई उपस्थित होते.