ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील 9 महिन्यांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी परमबीर सिंह भारतातच आहेत. ते कुठेही गेले नाहीत. मुंबई पोलिसांपासून धोका असल्याने ते समोर येत नाहीत. त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील 48 तासात कोणत्याही सीबीआय कार्यालयात अथवा न्यायालयात हजर होतील, असा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला. त्यावर न्यायालयाने त्यांना अटकेपासून सुरक्षा प्रदान करत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होईल. परमबीर यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने ते जनतेसमोर येण्याची शक्यता वाढली आहे.