प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून पहिले रेल्वेगेट येथे बॅरिकेटस् हटविण्याबाबत आंदोलन करण्यात आले. हे बॅरिकेटस् हटवावे यासाठी 2014 पासून नागरिक आंदोलन करत आहेत. परंतु आजपर्यंत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, गृहमंत्री बेळगावमध्ये असल्याने त्यांनी या समस्येची दखल घ्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सुभाष घोलप, दीपक गुंडाळेकर, मदन रेवाळे, नाईक, वासुदेव जोशी, रिक्षा चालक, व्यापारी यांनी हे आंदोलन छेडले.