प्रतिनिधी/ सातारा
पानटपरीवर ’बिडी’ मिळतेय ना तशी ’ईडी’ची अवस्था झालीय. माझ्या हातात ’ईडी’ द्या. मग मी दाखवतो या सगळ्यांना. सध्या सारखे सारखे ’ईडी’ म्हणजे चेष्टा झालीय.त्यांना ताब्यात घ्या. चाप लावा सगळे सरळ होतील असे उदयनराजे सातायात कास येथे म्हणाले आहेत.
उदयनराजेंनी आज कास परिसरातील कामाची पहाणी केली, त्यानंतर पत्रकारांनी त्यांना सध्याच्या परिस्थितीकडे कसे पाहता असे विचारले यावर त्यांनी सडेतोड उत्तरे देत महाविकास आघाडीसह इतर नेत्यांवर टीका केली.
सध्याची परिस्थिती कोणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. आता सध्या सुरू असलेल्या राजकारण्यांच्या माकड उडया बघत बसतो. खूप मजा येते. कोण कोणाला आत टाकते, कोण कोणाला मारते. कोण काय म्हणंतय हा मुख्यमंत्री आहे का, तो आणखी काही तरी म्हणतो. काय बोलणार यावर बोलणार , असा प्रश्न त्यांनी केला. मी तर सगळ्यांना सांगतो की माझे आवडते चॅनेल ’टॉम ?ण्ड जेरी’ हे सुध्दा बघायचे मी बंद केलं आहे.
कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, कोल्हापूरला उत्कृष्ठ सभा झाली. भरपूर चांगली गर्दी झाली होती. एवढी लोक आली त्यावेळी तुमची डिलेव्हरी काय होती.यावेळी तुम्ही लोकांना काय दिलं.काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत.दांडक्याने सडकून काढली पाहिजेत. एका बाजूला लोक कसे जगत आहेत. आजही हजारो लोक रस्त्यावर झोपतात या लोकांना दिसत नाही. हे मात्र, एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्षे ते जेलमध्ये होते पण त्यांनी काय केले नाही. जे आता जेलमध्ये आहेत पण त्यांनीही काय केलेले नाही. लोकांना काय डोळे, मेंदू नाहीत असे वाटते काय, असे सांगून उदयनराजे म्हणाले, माझ्या हातात ’ईडी’ द्या. मग मी दाखवतो या सगळ्यांना. सध्या सारखे सारखे ’ईडी’ म्हणजे चेष्टा झालीय.पानटपरीवर ’बिडी’ मिळतेय ना तशी ’ईडी’ची अवस्था झालीय. त्यांना ताब्यात घ्या.लोक हसतात. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण माझे नाव कोणी घेतले तर बघतो. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागू नये.