जनजीवन विस्कळीत, पाणी ओसरत असताना पुराचा विळखा पुन्हा घट्ट
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर दुपारी थोडीशी उसंत घेतली. पण सायंकाळी पुन्हा मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अतिपावसामुळे पुन्हा पुराचा विळखा घट्ट होऊ लागला आहे.
पावसाने अधिक जोर घेतल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बेळगाव शहरालगत असलेले नदी-नाले मोठय़ा प्रमाणात प्रवाहीत झाले आहेत. मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुसळधार पावसाने बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पूर आला आहे. पावसामुळे शहरातील उपनगरांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सर्व पाणी ओसरले होते. मात्र, पुन्हा शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक नगरांमध्ये पाणीच पाणी झाले तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.
शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी
शुक्रवारी पावसाने उघडीप दिली. सूर्यकिरणही पडले होते. मात्र, त्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला. याचबरोबर शनिवारीही सकाळी दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले होते. पाऊस कमी होईल, अशी शक्मयता होती. मात्र, पावसाने आणखी जोर धरल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
पावसाने उसंत घेतली तरच दिलासा
पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळली आहेत. रस्ते खराब झाले आहेत. शिवारामध्ये पाणी साचून आहे. भातपीक कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आता पावसाने उसंत घेतली तरच दिलासा मिळणार आहे. जर पावसाचा जोर कायम राहिला तर यावषीही भात, सोयाबीन आणि बटाटा पिकाला फटका बसणार आहे. पावसामुळे काही पिकांना आणि काही भागातील शिवाराला दिलासा मिळाला असला तरी काही भागाला मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे.
महाद्वार रोड परिसरातही अनेक घरांमध्ये पाणी
मुसळधार पावसामुळे आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या तिन्ही नगरांमध्ये कंबरभर पाणी साचून होते. ते पाणी ओसरले असताना शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाद्वार रोड परिसरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरून होते. एकूणच झालेल्या दमदार पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली आहे.
शाळांच्या सुटीमध्ये वाढ करण्याची शक्यता
दमदार पावसामुळे बाजारपेठेतील भाजीविपेते, फेरीवाले आणि इतर व्यापाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी रविवारपेठमधील होलसेल विपेत्यांनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे हा निर्णय घेतला. त्यामुळे काहीसा दिलासा साऱयांनाच मिळाला असला तरी इतर व्यापाऱयांना मात्र पावसाचा त्रास सहन करावा लागला. दोन दिवस शाळांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरीच राहणे पसंत केले होते. असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा सुटीमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.